post 8

इतका ही space मागु नये ..
की नात्यात दुरावा येईल!

इतकही कठोर वागु  नये की 
आपलंच माणूस आपल्यावर रुसेल..

इतका ही संवाद तोडू नये की
मरणा आधीच नात्यांचा अंत व्हावा !

जवळीक इतकी ही साधू नये कोणाशी की
दुरावा आला की जखम जिव्हारी लागेलं...

इतकं ही मनाचं नातं नसावं की
राधा कृष्ण चा विरह शाप लाभावा !


© #vidyamslife
३०. ३ .२०२२

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .