post 68
Podcast बघितला छान होता. Parenting, philosophy हा विषय ही आला. पुढच्या वेळी ह्या विषयावर पण अजून ऐकायला आवडेल . आपल्या देशात family culture आहे पालक सतत मुलांचं कसं होईल विचार करत ते स्वतःला आणि पाल्याला मानसिक त्रास ही देतात आणि तुलना करतात. कोणत्याही परिस्थितीत सोबत राहू असा मानसिक आधार देणारे पालक मोजकेच असावेत. नोकरी करा पण कोणी कला क्षेत्र निवडलं किंवा व्यवसाय तर पालकांना अजूनही खटकतं! मानसिकता कधी बदलणार..
Labels:
vidya
post 67
दूध उतू जाऊ नये म्हणून उपाय .९ मिनिटात अंदाजे दूध गरम होत alarm लावावा ! नाहीतर कुकर घ्यावा किंवा चमचा ठेवावा . Mobile kitchen मध्ये वापरू नये !
#cookingtips
Labels:
vidya
post 66
विश्वास कमवावा लागतो!
तो ही प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कृतीतून कमवू शकतो नक्कीच!
***
प्रत्येक लेखन करणाऱ्या माणसा कडे माणसं जोडायची कला असेलच असं काही नसतं!
Labels:
vidya
post 65
विश्वास कमवावा लागतो!
तो ही प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कृतीतून कमवू शकतो नक्कीच!
#vidya
Labels:
vidya
post 63
अजूनही सुप्रीम कोर्टात भारतीय भाषेत काम होत नाहीत तर फक्त इंग्रजीत होतात. आता कुठे शेवटचा निकाल तरी ज्याची केस असेल त्या व्यक्ती च्या मातृभाषेतून द्यायला मोदी सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलं आहे ऐकलं होतं.
3days ago
post 62
आज काल तर रिक्षा चालक आणि त्यात बसणारे मराठी असले तरी हिंदी ही बोलणारे आहेत. मग रिक्षा वाले सुद्धा ग्राहकाच्या भाषेत बोलतात नाहीतर मराठी बोलतात. शहरात तर समोरची व्यक्तीला मराठी आहे माहिती नसेल तर सुद्धा हिंदी ,इंग्रजी भाषेत संवाद सुरू केले जातात. मानसिकता आहे नुसती. गुजरात मध्ये भाषेची संमेलन होत नाहीत तरीही तिथे गुजराती बोलतात सगळे. इतर राज्यातून कोणी आलं कळलं तरच हिंदी मध्ये बोलतात त्यातही काही अति शिकलेले इंग्रजी मध्ये बोलतात.
अजूनही सुप्रीम कोर्टात भारतीय भाषेत काम होत नाहीत तर फक्त इंग्रजीत होतात. आता कुठे शेवटचा निकाल तरी ज्याची केस असेल त्या व्यक्ती च्या मातृभाषेतून द्यायला मोदी सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलं आहे ऐकलं होतं.
#vidya
post 61
एका video मध्ये ऐकल होत. गैर कौमों के इबादत खानों में नमाज पढ़ना
मकृहे तहरीमी है जिसके करने से इबादत अधूरी रह जाती है!करने वाला गुन्हेगार होता है! मुस्लिम देशात मशीदी तोडतात विकास काम करताना. आपल्या इथे फक्त राजकारण सुरु असत.
Labels:
News
post 60
४००/५०० रु द्या आणि ५ हजार व्यक्ती पर्यंत तुमची पोस्ट पोहचवा जाहिरात fb ची .. त्या पेक्षा एक चांगलं पुस्तक च आणलेलं बरं की.
#वाचन
Labels:
News
post 59
जनगणना दर दहा वर्षांनी होते lockdown च्या काळात पुढे ढकलली गेली. ह्यावेळी पहिल्यांदा Digital Census होणार आहे.👍
post 58
लहानपणी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता .किती बरं झालं. Less distraction. फक्त tv तो पण इतकं बघायची सवय नाही झाली कधी. निवांतपणे पाहिजे तेव्हा tv बघितला आणि हवा त्या वेळेला अभ्यास केला.
आता ची पिढी पालक तर मुलं बडबड करायला लागली तर सरळ हातात मोबाइल देतात.
काही जण सावध असतात. काही game चे app टाकत नाहीत.
मुलं वापरतील म्हणून.
ह्या technology मुळे काही जण तर लहानपणी खेळ सुध्दा मैदानी खेळत नाहीत.
post 57
आज काल लहान मुलांच आयुष्य मोबाईल मध्ये अडकलय . आमच्या वेळी पूर्ण society मधली मुलं जमा व्हायची. लपाछपी, garden मधले खेळ ... मज्जा असायची. Net नव्हता म्हणून tv वर video game पण खेळायला शेजाऱ्या कडे जायचो.
28 june 2023
Vidya
post 56
आयुष्याच्या खऱ्या रंगमंचावर
वावरताना , असंख्य भूमिका पार पडत असतो आपण.. कोणी आई ची कोणी मुलीची , बायकोची , बहीणीची. तर कोणी बापाची ,मुलाची ,नवऱ्याची ,भावाची.कधी गुरु शिष्याची , कधी मित्र मैत्रीणीची.
संवादामुळेच माणूस घडत जातो , रोज नवं काही आपसुक शिकतो .पण प्रत्येक भूमिकेत तो वेगळाच असतो . वेगळच वागणं असतं ,
कधी कठोर ,कधी मृदु , कधी खट्याळ, कधी निरागस.
भाव विश्व कसं खुलुन निघतं, आयुष्याचे क्षण कधी हसरे होतात , सुख दुःखाचे सोबती होतात. अल्लड मनाच्या भाव विश्वात रमू लागतात. नात्याची सुंदर पहाट अनुभवतात.
#विद्या
29 june 2016
Labels:
vidyamslife,
ललित लेखन
post 55
येऊर मध्ये बंगले बांधतात माणसं आणि मग जंगलात झाड फळ नसल्यामुळे माकड शहरात येतात. आज आमच्या इमारती मध्ये उड्या मारत होते.
post 54
माणसांची भूक मनाची असते प्राण्यांची अन्नाची भूक . पोट भरलं की ते निवांत असतात. मग इतर प्राणीही मुक्तपणे वावरतात.
मागे एक painter आलेले सांगत होते एका महाराष्ट्रातल्या नेत्याकडे दहा घर बंगले आहेत आणि इमारत ही विकत घेतली आहे म्हणे . तिचं पण काम सुरू. माणसां पेक्षा पाळीव प्राण्यांवर जास्त खर्च करतात ही लोक. काम करायला माणूस आला घरी तर पाणी सुद्धा विचारत नाहीत.
#vidyamslife
Labels:
Marathi,
vidyamslife,
विचार
Subscribe to:
Posts (Atom)
