post 4

Saw one english  movie today. Message was clear  in that movie bad times show who are your real friends or relatives.

व्यक्ती वर वेळ आली आपलं कोण परक कोण कळतं. खरं तर मुखवटे बाजूला  होतात. ती वेळच जाणीव करून देते.

The movie ends with good people ends with good life ahead after knowing real and fake ones.

#vidyamslife

post 3

Saw one english  movie today. Message was clear  in that movie bad times show who are your real friends or relatives.

व्यक्ती वर वेळ आली आपलं कोण परक कोण कळतं. खरं तर मुखवटे बाजूला  होतात. ती वेळच जाणीव करून देते.

The movie ends with good people ends with good life ahead after knowing real and fake ones.

#vidyamslife

post2



आयुष्यात काही घटना घडतात आणि आयुष्याचे दोन भाग करून जातात. प्रत्येक जागेची पण आठवण असते. 
जागा आपण राहतो ती ठिकाण असतात किंवा सतत आपल्या माणसांसोबत फिरण्याची ठिकाण कधी गाव कधी घर!

त्या त्या जागेवर गेलो की भूतकाळाच्या आठवणी ताज्या करतात. सुख ही आठवते आणि दुःख ही !

 गेलेल्या क्षणाच्या चांगल्या स्मृती आणि आयुष्यात आता असलेल्या ची सोबत तर नसलेल्या व्यक्ती च्या स्मृती ! 

© विद्या

८.७.२०२३

#vidyamslife

post 1




प्रवास

प्रत्येकाचा अर्थ , काम , धर्म , मोक्ष या पैकी एक तरी मार्गावरचा प्रवास सुरू असतो.स्वतः ला त्याची जाणीव असली तरी खूप आहे. समाज चार दिवस सल्ले देतो चौकटीतल साचेबद्ध आयुष्य जगायचा आणि आपल्या मार्गाला निघून जातो.
शेवटी स्वतःचा प्रवास स्वतः करायचा असतो कधी सोबत असते कधी नसते. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं मग भले कोणी वंदो किंवा  निंदा करो. माणूस जन्माला येतो तो अहं घेऊन. जे विधिलिखित असतं तसं आयुष्यात घडत जात . आयुष्याला प्रश्न विचारणं म्हणजे देवालाच जाब विचारण्या सारखं आहे की. आपल्या हातात फक्त आयुष्य स्वीकारणं आणि आपलं कर्म करणं असतं.  जिथे निवांत होत मन ती दिशा योग्य. कर्माची फळ ही तोच ठरवतो आणि कर्म ही तोच करून घेतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. ओशो बोलतात ;जग निर्माण करण्याचं देवा कडे काही प्रयोजन नाही. खेळ आहे ; देवाची लिला आहे. आयुष्याकडे गांभीर्याने जगायचं ही काही कारण नाही.आलेला क्षण जगायचा. एका वेळी एक दिवस एवढंच आयुष्य. उद्या कधी येतच नसतो .
४.७.२०२३
©vidyams

नाती

जिथे भावना असते तिथे नाती असतात .जिथे भावना नसते ती  नाती च नसतात . मग ती रक्ताची का असेना . जिथे भावनेचा ओलावा असतो. ती नाती खरी. शेवटी आठवणी उरतात मग व्यक्तीच अस्तित्व असो किंवा नसो. व्यक्ती सोबत असो किंवा नसो. मनाची सोबत खरी.

...

माणसं  दूर होतात ती देहाने नाही ; तर मनाने. मनाने दूर झालेल्या नात्याचं अस्तित्व शून्य च मग सोबत असो किंवा नसो सोयर सुतक ही नसतं!

४.७.२०२३

#vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .