September 2017
Corruption
bjp चे सरकार आलय म्हणून काय भ्रष्टाचार थोडी कमी झालाय... काहींची पैश्याची भूक कधीच कमी होणार नाही .. शाळा कॉलेजमध्ये Donation च्या नावाखाली लुटतात जनतेला... सरकारी काम असते वेळी चार पैसे हातात दिल्याशिवाय कुठे काम होतात... भस्म्या झालय का किती खाणार किती छळणार जनतेला .. अण्णा हजारेंच आंदोलन झालं पण निकाल काही पूर्ण लागलेला नाही.. right to recall कायदा तरी यायला हवा
#विद्या
9.6.16
नातं
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए .. नात्याच्या बाबतीत मात्र वेगळं असतं ..नातं टिकवायचं असेल ... एकाला नमतं घ्यावं लागतं... व्यक्त होण्याने प्रश्न सुटतातही .. कारण तरी कळतं ..रुसव्या फुगव्याच .. आपण आपला प्रयत्न करावा नाही जमलं तर लांब राहिलेलं बरं ...तसही प्रत्येक नात्या ची किंमत ज्याला त्याला माहिती च असते आणि एकमेकांच्या आवडी निवडी मत आणि विचार ही...समोरच्या व्यक्ती च वागणं ही..
#विद्या
9.8.16
Dosa chatni recipe
डोसा हिरवी चofणी पाककृती
====
Chatni
=====
1.Grind the Coconut with 1 green chilli , coriander , 1 garlic.
2.Add tadka of oil ,rai , 2 curry leaves
3.Serve this chatni with dosa
विश्वास
स्वतः वर स्वतःच्या वागण्यावर विश्वास असेल .. ऐकावे जनाचे करावे मनाचे .. ह्या प्रमाणे वागायला ..कोणत्याही गोष्टीवर विचार करून अंतिम निर्णय घ्यायला स्वतंत्र्य असतो .. निर्णय हि स्वतः चा मग परिणामाची जबाबदारी हि स्वतः ची । #विद्या
8 Sept 2016
Be as u r
R u perfect ? No then why should one expect others to be perfect.
Be As You are .. !
आपण आहोत तसेच स्वतः ला स्विकारलं तर इतरही स्विकारतात कि .. !
अपूर्णतेही पूर्णते कडे जायचा ध्यास असतो की।
#विद्या
8 Sept 2016
पुरोगामी आणि प्रतिगामी
पुरोगामी विचारवंत (so called ) ह्याची साधी व्याख्या हिंदु विरोधी विचारसरणी ।
प्रतिगामी म्हणजे Orthodox culture वाले । भूतकाळाच्या विचारसरणी वर जगणारे ।वर्तमानातले बदल न स्वीकारणारे ।
Graffiti
काही जण स्वत : ची मत
मांडण्यापेक्षा
लादण्यात
अग्रेसर असतात
View
One Woman Killed in Karnataka Noticed by all media and politician but People Killed in kerala including RSS ,Congress members no media gives coverage. #politics #kerala
Graffiti
वयाने मोठे होता बालपणीचा निरागस कप्पा मात्र जपून ठेवावा । गंभीर स्वभाव करून मोठ्या माणसां सारख जगण्यात कुठे असते मज्जा ।
4-9-17
प्रेम
प्रेम म्हणशील तर दोन मन जुळली की च होतं ।
अमेरिका एका वेळी एका व्यक्ती शी प्रामाणिक राहतात ..आपल्या भारता सारख लपून नाती ठेवत नाही । मनाचं नातं जुळतं ते प्रेम आणि त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवणं काही च गैर नाही । सृष्टी त्यावरच निर्माण केली आहे द्वैत वर ।
खजुराहो बद्दल #sadguru नि सांगितलं ते पटलं
मूर्ती बाहेर आहेत वासना किंवा द्वैत भाव संपेपर्यंत त्या मूर्ती कडे बघा आणि एक दिवस नक्की वासना क्षमेल... नंतर मंदिरात प्रवेश करा ..म्हणजे तेव्हा परमार्थ सुरू ।
खजुराहो
खजुराहो बद्दल ओशो आणि सद्गुरू बद्दल विचार मांडले आहेत त्याबद्दल एवढच कळलं कि कामसूत्र विज्ञान सारख लैंगिकता ह्या एका विषयावर लिहिलेलं पुस्तक आहे . त्यात अश्लील काही नाही . मंदिराच्या बाहेर मुर्त्या दिसतात आत नाही. स्त्री पुरुष ह्या द्वैत भावातून संसार झाला .मनुष्याने संसाराचा उपभोग घेऊन झाला किंवा ह्या मूर्ती कडे सारखं बघत राहिल कि एक दिवशी नक्की उबग येईल वासना कमी होतील संसारात मन रमणार नाही . तेव्हा मंदिरात प्रवेश करावा म्हणजे परमार्थ ...अद्वैत भाव सूरु .
======
नास्तिक जितक्या देवा विषयी आणि धर्मा विषयी चर्चा करतात तितक्या चर्चा तर आस्तिक सुध्दा करत नाहीत म्हणून अंधश्रध्येचे बळी होतात लोक ....
======
वासना मोकाट च असते आणि ज्याच्या कडे विवेकबुद्धी नसते ते त्या वासनेचा शिकार होतात । त्याच्यात आणि जनावरात काही च अंतर नाही। मनुष्य जात देव आणि जनावर ह्याच्या मध्यभागी आहे । हे संतुलन राखायला बुद्धी दिली आहे । धर्म ही आलेत ।
Quotes
Acceptance of life the way it moves gives happiness . Expectations from life or from others gives sadness only .Sages says.
Quotes
Live in present. Past is gone.
Future is just imagination. Everything happens is in present only.
#Mooji
मराठी भाषा संवर्धन
मराठी माणसाला मराठी चा अभिमान नाही ।मराठी माणसाला शुद्ध मराठी बोलता येत नाही. इंग्रजी ,हिंदी वरचढ झाली . ही झाली नकारात्मक बाजू.
आणि सकारात्मक बाजू ही आहे की मराठी भाषा जपावी म्हणून मराठी बोला चळवळ , मराठी एकीकरण समिती , मी मराठी एकीकरण समिती , मराठी पुस्तक ईपुस्तक काढणारे प्रकाशक मराठी वाचक व्हावे , व्यवहारात जास्त वापर व्हावा , मराठी शाळेत मराठी अनिवार्य करावं ... मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी झटत आहेत। त्यांना आताच्या पिढीला सुधारण्या पेक्षा पुढच्या पिढीला मराठी जपावी याकडे लक्ष आहे ।आता हे अभिमान असलेले मराठी जपावी म्हणून काम करणारे 5-10 % असले तरी मराठी जपणाऱ्याची सकारात्मक बाजू वरचढ ठरते।भुतकाळ पिढी कशी आहे ,किती चुका केल्या दुरुस्त करण्या पेक्षा त्या चुका पुढच्या पिढीला कश्या टाळता येतील या कडे मराठी संवर्धन करणार्या साठी झटणाऱयाना रस आहे।
मराठी भाषा
व्यवहारात राज्य सरकार वापरत नाही त्याला काय करणार । मराठी मध्ये एकाने पत्र लिहिलेलं त्याला उत्तर काय तर भाषा कळली नाही। आम्हाला आहे की अभिमान । बाकीच्या मराठी न बोलणाऱया साठी मी नाही काही करू शकत।
=======
भाषा जपायची एकत्र होतायत हे समिती वाले ते कमी आहे का । त्याचं संकेतस्थळ @ http://marathiekikaran.com राज्य सरकारच्या संपर्कात असतात. राजकीय नेत्याचा उदासीन पणा हे तर नक्कीच आहे मराठी शाळा कमी व्हायच कारण ।
=======
मराठी पालकांमध्ये मराठी भाषेचा न्यूनगंड ..इंग्रजी बोलली की दर्जा वाढतो लोकांचा ..असा समज वाढतो आहे । मोठ्या गोष्टी असो वा छोट्या आम्ही मराठी जपणार ..स्वप्न पहिलीच नाही तर पूर्ण कशी होणार भले ती छोटी असो वा मोठी ।
मराठी बोला
महराष्ट्रात हिंदी , इंग्रजी वरचढ ठरते .मराठी माणसाला च एकी कडे मराठी अभिमान नाही तर मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड जास्त म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जात आणि हे च पालक पैसे जास्त घेतात म्हणून मागून बोलतात. हिंदी राजभाषा आहे आहे राष्ट्रभाषा नाही हे माहिती च्या अधिकाराने सिद्ध च झालं आहे. हिंदी वरचढ झाली म्हणून प्रत्येक राज्याला आपली भाषा जपण्याचा अधिकार आहे .राजभाषा अधिलेखत काही लिहिलंय असं. मराठी बोला मराठी जपा हे महाराष्ट्र राज्यात राहून मराठी माणसाला सांगावं लागतं हे भारी काम । इतर राज्यातले इथे येऊन त्याची भाषा जपतात । #मराठीबोला ह्याला मराठी माणूस आणि मराठी राजकीय नेते च जबाबदार । दुसरी कडे काही समिती काही प्रतिष्ठान जपायचा प्रयत्न करता आहेत याच समर्थन तरी करा। कोणाला प्रोत्साहन देण्या पेक्षा त्याच्या विरुद्ध वागायची सवय झाली आहे।
मराठी भाषा संवर्धन
#मराठी भाषा संवर्धन
---------
मराठी भाषा टिकावी यावर चर्चा झाली मी मराठी एकीकरण समिती सोबत facebook comment मध्ये fb frnd च्या पोस्ट वर ...
माझी मत आणि विचाराना दिशा मिळाली .
ते बोलले इंग्रजी महाराष्ट्र मधुन हद्दपार करायची. सध्या तरी शक्य नाही . मराठी भाषा व्यवहारात आणि संवादात वापरली तर टिकेल.हे तर एकमत झालं. इंग्रजी शाळा बंद व्हाव्यात तर मराठी शाळा आणि भाषा जपली जाईल असा विचार आला. आपण महाविद्यालयात गेलो की परकीय भाषा शिकू शकतो की चिनी ,जपानि , फ्रेंच भाषे सारख्या मग त्यात इंग्रजी का नाही .त्या साठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गरज च काय . शिक्षण मातृभाषेत असावं यावर इतर देशातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं ते ही संशोधन सुरूच आहे अजून.
#विद्या
ओळख
जसं आई मुलीच न बोलता ही जरा काही बिनसलं तरी एकमेकांना कळतं . एक मैत्रीचं . जेव्हा मन विचार जुळतात तेव्हा मैत्रीचं नात ही उलगडत जातं . जितकं व्यक्त व्हाल तितकंच उमगत जातं . आपण आहोत तसं आपसूकच एकमेकांना स्वीकारलं जातं. वयाची अट नसते फक्त मन जुळण एवढीच अट . तिथे मैत्री च नात खुलतं बहरतं.
टाळी एका हाताने वाजत नाही.
सगळ्याशी आपलं पटायला हवं स्वभाव एकमेकांचे जुळायला हवेत हा हट्ट पण चुकीचाच.
आणि एक ओळख जी स्वतः ची स्वतः ला असावी लागते. आपण जितकं स्वतः ला ओळखतो तितकं कोणीच ओळखू शकतं नाही .म्हणून कधी कधी स्वतः शीच भेट घ्यावी. कोण किती ओळखत आपल्याला हे ही आपल्यावरच अवलबुनं असतं.आपण जितकं व्यक्त होतो त्यावरून. शेवटी संवादाशिवाय ओळख होणं अशक्यच.
#Vidya

