विचार

जवळ असो वा दूर आपल्या माणसाचं अस्तित्व पुरेसं असतं! मनाने दिलेली सोबत ..सुसंवाद मन प्रसन्न करतं!

.....

आयुष्यात बदलणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या की जगणं सुखद होतं!

....
बालपणापासूनच माणसं अनुकरण करायला शिकतात. इतरांचं जगणं बघून स्वतः मध्ये ही बदल करतात. चांगले विचार स्वीकारतात. मनाला धीट करतात.मनोबल वाढवतात.
विद्या
   २९.१०.२०१९

आठवणी

भूतकाळातल्या कटू आठवणी
मनात गुंता करत असतील तेव्हा
वर्तमानात जगायला शिकावं मनमोकळं..
नवीन क्षण जगावे..नव्या आठवणी गोंजाराव्या.. पुढे सरकत जावे ..छंद जोपासावे..संवाद साधावे.. कधी सगळं कठीण वाटणार जगणं सुद्धा सोपं व्हावं .. मन गुंतवावं आजच्या क्षणात.. विस्मरण सुद्धा एक शक्ती असते याची जाणीव व्हावी .. ! #vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .