लग्न समाज

आपल्या समाजात त्या काळी तरी लग्न केलं नाही तर मान मिळत नाही ! समाजाच्या नियमानुसार सर्व झालं तर मान मिळतो !

सारिका




सारिका ठाकूर मराठी घरात जन्मलेली हिंदी सिने सृष्टी गाजवली होती तिच्याकाळी.. चार वर्षांपासून चित्रपटात काम करावं लागलं .. वडील सोडून घर गेले तेव्हा पासून.. आई ने सगळी कमाई 21 वर्षे तिने कमावलेली सगळी स्वतः कडेच ठेवली ! तिची कमाई तिला मिळत नाही कळल्यावर घर ही सोडलं .. कार मध्ये राहून काही दिवस काढले मग नंतर मित्रमंडळी नी मदत केली ! संघर्ष सुरूच तिचा ! लग्नाच्या प्रथेवर  विश्वास नव्हता तरी दोन मुलं झाल्यावर लग्न केलं आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला । वागणं बदललं ! वेळ आली की ओळखी चे वाटणारे ही अनोळखी वाटू लागतात  ! किंवा नव्याने ओळख होते काहींची। हेच खरं ! Simi Garewal कार्यक्रमात बोलत होत्या त्या ! ( https://youtu.be/L7wkyoULNMI  ) आता काळ बदलला विवाह संस्थेत बदल होत आहे  living relationship सुध्दा आली ...कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते हे मात्र खरं!
#vidya

ख्वाबों को देखना ..

ख्वाब देखना जारी है
क्योकीं
ख्वाबो को हकीकत  में होते देखने में बडा सुकून मिलता है !

Vidya

ख्वाब

ख्वाबो को हकीकत में होते  देखना सुकून की बात है !
#vidya

पालक आणि मुले


क्रिकेट आणि खेळाडू

क्रिकेट फक्त पैसे कमवण्यासाठी खेळतात त्यात खेळणारी प्रत्येक व्यक्ती देशभक्त असेल च असं नाही .. सचिन तर BCCI ambassador आहे पहिला ..!  तो क्रिकेट चा विचार करणार ! त्याला कुठे पडली आहे देशाची सेनेची !

बातमी

शहीदांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी Facebook fundraiser मधून बडोद्याच्या परदेशात राहणाऱ्या मुलाने सहा करोड जमा केले ..! 👏👏

समस्या समाधान

जगातले खूप सारे प्रश्न संवाद न केल्यामुळे किंवा मैत्री भाव नसल्यामुळे सुटतं नाहीत। दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून संवाद करणं टाळणं योग्य नाही..मार्ग काढायची जबाबदारी दोघांची असते की ..! मग कोणतं ही नातं असो!
#vidya

निरोप

टाळी एका हाताने वाजत नाही .. ! जर पुढे जमत नसेल मैत्री टिकवणं किंवा कोणी अति करत असेल तर सरळ सांगून मोकळं व्हावं ना! संवाद न करता समोरच्याला काय कळणार दुसऱ्या ला माझं हे वागणं खटकलं किंवा आता खटकतंय ! निरोप देताना सुद्धा सांगून द्यावा !

आठवण

कुंजविहार च्या वडा पाव चा video नाही पाहिला पण पूर्वी खूप खायचो कॉलेजमध्ये असताना  ! खाण्याचा दर्जा वेळोवेळी तपासलाच पाहिजे की सरकारने ! आमच्या इथे sandwich वाला आहे FSSAI certificate लावलं आहे त्याने गाडीवर हे सगळयांनी लावणं अनिवार्य करायला हवं  !

निवृत्ती

निवृत्ती एक अफवाच ! काहींना पन्नाशी झाल्यावर लागायला सुरु होते आणि काहींची नव्वदी पार झाली तरी लागत नाही ! #vidya

श्वान

स्वतः च रक्षण करणं हे ही प्राथमिक गरज आहे प्राण्यांची मग माणूस का मागे रहावा ! पिसाळलेल्या कुत्र्यांना प्राणीमित्रांनी स्वतः च्या घरी च ठेवावं की मग इतकं प्रेम उतू जातंय तर ! लहान मुलांना ही हे कुत्रे सोडत नाहीत त्यांचा काही दोष नसताना जीव घेतात हे कुत्रे तेव्हा कुठे असतात हे श्वान प्रेमी!  भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नसबंदी करायला च हवी !

आठवणी

आठवणींच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जातांना ते खूष असतं
येतांना त्याला येववत नाही
~ चंद्रशेखर गोखले भूतकाळात रमणे ठीक नसतं मनाचा नुसता छळ तो.. डायरी लपवून ठेवायला हवी !

....

माणसांची ये जा सुरूच संपर्कात नसणाऱ्यांना फक्त जिथे असाल तिथे सुखात  रहा इतकीच प्रार्थना करणं आपल्या हातात असतं की !

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .