गरजेपेक्षा जास्त मोठी न झेपणारी स्वप्नांची किंमत मोजावी लागते शेवटी! काही भरघोस कर्ज घेऊन नंतर जीव गमवतात! #ccdfounder ताजं उदाहरण
प्रवासी
काही प्रवास एकट्यानेच करायचे असतात! वाटेत चालताना सोबती भेटतात प्रत्येक वळणावर नवीन सोबती! जुन्या सोबतीचा निरोप घेतला की जो तो आपापल्या वाटेवर चालायला मोकळा! मुक्त प्रवास अटळ वळण ... एक पल्ला गाठला की दुसरा पल्ला साद घालतो! असाच प्रवास अविरत सुरू राहतो! कोणाच्या सोबतीने तर कधी एकट्याने!पावलं मात्र चालत असतात स्व च्या शोधात !थांबला तो संपला! एक स्तब्ध क्षणच पुरेसा असतो आयुष्याला मिठीत घ्यायला! आनंदाची उधळण करायला ! तृप्त मनाचा झरा कसा मग ओथंबून वाहू लागतो अथांग अविरत! शेवटी प्रवासी मुक्काम गाठतो आणि चैतन्याचा झरा अविरत सुरूच राहतो! अन् तीरावर आनंदाच्या वर्षावात चिंब भिजून जातो!
दिशा
प्रत्येक वेळी शिक्षण घेतो त्याच क्षेत्रात माणूस पुढे जातो असं नसतं ! नव नव्या वाटा आयुष्यात गवसत असतात ! नव्या दिशा दाखवतात! मग कोणी कला क्षेत्र निवडत कोणी इतर आवडीचे क्षेत्र ! जिथे मनाला समाधान मिळेल ! जिथे काम करून माणूस थकणार नाही अशी एखादी passion जपावी! कधी तीच उपजीविकेच साधन होते!किती कमावतो पेक्षा आयुष्य किती मनमुराद पणे जगतो हे महत्त्वाचे! समाधानी मन अंतिम सुख असतं! ज्याला गवसत तो धन्य! आयुष्य घालवण्या पेक्षा जगणं महत्त्वाचं मग सगळे करतात म्हणून त्याच पद्धतीने आयुष्य जगायला हवं अशी अट नसते! #vidya
सुसंवाद
सुसंवाद करणारं घर असेल तर वेळे नुसार निर्णय घेणे किंवा बदलणं ही येतच ! इतकी मोकळीक सगळीकडे कुठे असते मुलांना! आपली मत थोपणारे पालक जास्त असतात! दुसऱ्यांची घर विभक्त होतात म्हणून सगळ्याच घरात असं होईल असं नसतं !
प्रारब्ध
प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं! उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्ट घडली म्हणून आपल्याही आयुष्यात तसं होईल यावर आयुष्य घडत नसतं! प्रत्येकाच्या आयुष्यात नवं नवे रंग , नव्या दिशा, वेगळी वेगळी वळणं असतात कधी चढ कधी उतार ही असतो !प्रत्येकाचं अस्तित्व भिन्न हेच वेगळेपण असतं !

