दिशा

प्रत्येक वेळी शिक्षण घेतो त्याच क्षेत्रात माणूस पुढे जातो असं नसतं ! नव नव्या वाटा आयुष्यात गवसत असतात ! नव्या दिशा दाखवतात! मग कोणी कला क्षेत्र निवडत कोणी इतर आवडीचे क्षेत्र ! जिथे मनाला समाधान मिळेल ! जिथे काम करून माणूस थकणार नाही अशी एखादी passion जपावी! कधी तीच उपजीविकेच साधन होते!किती कमावतो पेक्षा आयुष्य किती मनमुराद पणे जगतो हे महत्त्वाचे! समाधानी मन अंतिम सुख असतं! ज्याला गवसत तो धन्य! आयुष्य घालवण्या पेक्षा जगणं महत्त्वाचं मग सगळे करतात म्हणून त्याच पद्धतीने आयुष्य जगायला हवं अशी अट नसते! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .