प्रवासी

काही प्रवास एकट्यानेच करायचे असतात! वाटेत चालताना सोबती भेटतात प्रत्येक वळणावर नवीन सोबती! जुन्या सोबतीचा निरोप घेतला की जो तो आपापल्या वाटेवर चालायला मोकळा! मुक्त प्रवास अटळ वळण ... एक पल्ला गाठला की दुसरा पल्ला साद घालतो! असाच प्रवास अविरत सुरू राहतो! कोणाच्या सोबतीने तर कधी एकट्याने!पावलं मात्र चालत असतात स्व च्या शोधात !थांबला तो संपला! एक स्तब्ध क्षणच पुरेसा असतो आयुष्याला मिठीत घ्यायला! आनंदाची उधळण करायला ! तृप्त मनाचा झरा कसा मग ओथंबून वाहू लागतो अथांग अविरत! शेवटी प्रवासी मुक्काम गाठतो आणि चैतन्याचा झरा अविरत सुरूच राहतो! अन् तीरावर आनंदाच्या वर्षावात चिंब भिजून जातो!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .