प्रश्न

प्रश्न विचारणं उत्तर जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती  बालपणा पासूनच असते ...  जेवढं ध्यास घेऊ तेवढं उत्तर लवकर मिळतं ... स्व चा शोध घेणं ... इथूनच सुरु होतं असावं ... #विद्या

दिवाळी शुभेच्छापत्रे



गम्मत

एक wrong number ची गंम्मत ... Up bihar वरून call ... मराठी English मध्ये बोललेलं समजलं नाही बायकांना त्या ... मग right number वर बोलतो तसं बोलायला सुरवात केली कैसन वा हो ... सब ठीक बा .. हा हा हा ... बबलू कैसा है ... (उनके घर में  हो या ना हो .. ) ... असल्या संवादाने phone वरच्या बाई ची बोलती च बंद करून टाकली हा वडीलांनी ... नाहीतर सारखा सारखा Call करून दोन दुपारच्या झोप मोडल्या ना ह्या wrong number वाल्या बाईने ...

Relax

Relax योग्य शब्द ... ज्या कामात जीव ओतून काम करावंसं वाटतं ते क्षेत्र योग्यच ... पण कलाकार ... रसिक प्रेम ... सारी अनुभूती ...सुख ... आणि त्याहून महत्वाचं स्वतः काळजी घेणं नाही का ? जे थकतं ते शरीर ... मन मात्र कधीच थकतं नसतं म्हणून त्याला मरण नाही ... #विद्या

राजकारण

राजकारणी मतासाठी वाद विवाद टोकाला जाऊन करतात मात्र जनतेचे प्रश्न सोडवायला  वाद विवाद कधीच करताना दिसत नाही ... मतदाराची आठवण निवडणूक जिंके पर्यंत ...

वाढदिवस

जे जे आपल्या वाढ दिवसाला केक कापतात त्यांच्या साठी .... आणि उरलेला केक तोंडाला फासतात त्यांच्यासाठी ....अन्नाचा अपमान  तो..
घर की मुर्गी दाल बराबर तसं स्वतः च्या संस्कृती पेक्षा इतरांच्या संस्कृती च अनुसरण करण्यात रस ...

सैराट बघितला ? मग ही कथा जरूर वाचा ....

सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .