नाती मनामनाची

रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जवळची असतात , समजूनही घेतात  , मानसिक आधार ही देतात. समाजात कसं वागावं कसं नाही याचं भान ही असतं म्हणून काही नाती  जुळतात आणि घट्ट होतात . आयुष्यभराचे सोबती होतात. त्यांना जपायचं इतकंच आपल्या हातात असत. निस्वार्थी मनाने जुळलेली नातीच खरी असतात.  नाहीतर नातेवाईक कितीही रक्ताची नाती असली तरी काही खेकड्याची जात असतात दुसऱ्याचा विकास झालेला बघून जळणारी. तर काही सतत टोचून बोलणारी एखादी समस्या असेल तर सोडवण्यासाठी मदत न करता आगीत तेल घालून मानसिक त्रास देणारी . असली नाती नसलेलीच बरी.  मनाचं connection झालं नसेल तर समजून घेण्याची अपेक्षा तरी कशाला करायची. 

 © Vidya m s 

समाजसेवा

समाजात अशीही लोकं आहेत जी चार चौघात नाव व्हावं लोकं ओळखावी म्हणून समाजसेवा करत असतात  ! 
माणूस म्हणून दुसऱ्याला मात्र कमी लेखण्यात धन्यता मानतात ! माणुसकी नसलेले ही समाजसेवक असतात 😎
आणि social media वर गाजावाजा ही करतात ! 😃😆
म्हणून एखादा माणूस समजासेवा करतोय म्हणजे तो चांगला 'च' असेल असं काही नसतं ! काही जण समाजसेवा करतात आणि काही मिरवतात !
#Vidyamslife

जय जवान

अहिंसेच्या गोष्टी करणारे हुतात्मा देशवासियांसाठी आपल्या जीवाचं बलिदान देतात म्हणून स्वतः जिवंत आहेत हे विसरतात !

जय जवान ! 
....

बिहार बेगूसराय के राजीव रंजन जी के इकलौते पुत्र शहीद सैन्य अधिकारी ऋषि रंजन, जिनकी पोस्टिंग जम्मू-कश्मीर के नौसेरा सेक्टर में थी

शनिवार की शाम पाकिस्तान के बॉर्डर इलाके में गश्ती के दौरान विस्फोट में ऋषि शहीद हो गए।अगले माह बहन की शादी थी

BJYM pays respects to this hero!
Fb @ Tejasvi  Surya 

जय जवान ! 🙏

.....

#news



विचार

काही जखमा शेवटच्या श्वासापर्यंत ताज्याच राहतात . उदाहरण आपल्या जवळच्या व्यक्ती च निघून जाणं.
#vidyamslife

विचार

दिवाळी हिंदूंचा सण आहे आणि टिकली शिवाय हिंदू स्रियांचा शृंगार पूर्ण होत नसतो .

From Arabic arches and No bindi to lit brass lamp, bindi and smile! Tanishq has come a long way in 5 days! #NoBindiNoBusiness

Shefali Vaidya  यांची मोहीम फत्ते झाली !

याच केला होता अट्टहास 🤣


कायदा फक्त सामान्य माणसा साठी असतो

ज्या पद्धतीने समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप होतात आणि हेच अधिकारी जाच प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी दाखवतात.
हेच जर देशातल्या नेत्यावर केलं असतं तर त्यांनी भ्रष्टाचार करुन ही सुटले असते आणि काही सुटलेही आहेत आणि काही अजून ही सत्तेवर  राहून मोकाट भ्रष्टाचार सुरू ठेवत आहेत.जितके कठोर सामान्य माणसां साठी असतात तितके कठोर कानून नेत्यांसाठी का नाही झाले ??
हे चोर हेच पोलीस हेच शिपाई

#vidyamslife

my quotes

Be Yourself ! No need to be a copy of somebody else.
#vidyamslife

जेवण

जेवण झाल्यावर पाऊण किंवा एक तासा नंतर पाणी पिणे उत्तम.
जठर अग्नी विजतो , अन्न पचन होत नाही मग.
मांडी घालून बसा.
बोलू नये जेवताना.
जेवण झाल्यावर त्याच पाण्यात हाथ धुवू नये.

Vidya

हो म्हणा

आयुष्यातले वाद टाळण्यासाठी फक्त हो म्हणायचं .
समोरच्याचा अहंकार नाही बोलल्यामुळे दुखावला जातो म्हणून हो म्हणा.
वाद टळतील.करायचं मात्र स्वतःच्या मनाचं.

© Vidyams life

quotes

Life will change upside down with positive mindset.

Vidya

विचार ८

आयुष्यात योग्य वाट दाखवणारी माणसं भेटावीत, वाट लावणारी नकोच .

विचार ७

वाचन संस्कृती कमी असल्यामुळे आपल्याकडे वय बघून बोलतात.लहान वय असेल तर घालून पाडूनच बोलायचं.मी मोठा म्हणजे मीच बरोबर. आदर दिल्याने वाढतो हे मात्र विसरतात. नारळाच्या झाडाला नारळाच लागतात. आब्यांच्या झाडाला आंबे! एका झाडाला दुसरी फळ लागतील अशी अपेक्षा करणं चूक आहे.

नुसतं व्यावहारिक शिक्षण घेऊन उपयोग काय समोरच्या माणसा सोबत माणुसकीने वागता येत नसेल तर काय अर्थ नाही.

विचार ६

काल एका whatsapp group वर गोष्ट घडली NCB  समीर वानखेडे यांना अपशब्द बोलत होता एक जण इतरांनी समीर वानखेडे यांच्या समर्थनाच्या पोस्ट करून करून शेवटी त्या व्यक्तीला group सोडण्यास भाग पाडले . 👏👏
सत्यमेव जयते

देव तारी त्याला कोण मारी

विचार ५

वयाने मोठी माणसं लहान मुलांपेक्षा हट्टी असतात .🤣
मुलांनी आपल्या हितासाठी काही सांगितलं तर ऐकायचं की .
पूर्वी चार आश्रम असायचे ब्रम्हचर्य, ग्रहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम ,  संन्यासाश्रम .
अमुक अमुक वय झालं की आपली सत्ता मुलांवर सोपवायची की .. काही घरात तर सून आपल्या आवडती नाही आणली म्हणून सतत मुलांना टोमणे मारतात सासू.. साखरपुडा चा दिवस सुध्दा सोडत नाही...

आजारी असतील अमुक गोष्ट करायला सांगितली तर टाळाटाळ करणं ...

म्हणून वृद्धापकाळ म्हणजे दुसरं बालपण बोलतात ते उगाच नाही..😃🤣

@vidyams

विचार ४

मांजरेकर जी नथुराम गोडसे यांच्यावर चित्रपट काढणार आहेत ... नथुराम गोडसे यांनी गांधी ना मारलं इतकं खरा खोटा इतिहास त्यांच्या बद्दल माहिती आहे ...  या पूर्वी  गोडसे यांनी काय काम केली यावर भाष्य करणारा असेल असं सध्या तरी त्यांचे विचार वाचून वाटतंय.. बघू  .. 🤞 

स्वा सावरकर यांच्यावर ही चित्रपट काढण्याची तयारी सुरू आहे ...
hope for best !

विषय तर जबरदस्त निवडले आहेत .










 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .