आरक्षण

खालील लेखावर मत
----------------
#आरक्षण  आर्थिक आधारावर  आणि ठराविक काळासाठी असावं
---------
आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले  दलित स्वतः ला दलित म्हणून आरक्षणाच्या कुबड्यावर जगता आहेत ... तेही  बहूसंख्य कर देतात त्यावर ...ब्राह्मण या समाजाने आंदोलन काढलं तर जाती वर आरक्षण मुक्त भारत साठी असेल ... तेव्हा करतील का हे दलित समर्थन । # विद्या 
--------------
#लेख
*वाचा ब्राम्हण समाजाविषयी एका दलित अभ्यासकाचे जाहीर निरीक्षण*
मला ब्राह्मण बांधवांचे नेहमी कौतुक वाटते !!
- देशातील ब्राह्मण समाज.
लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्राह्मण मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले.
-कोणतेही घोषित आरक्षण नसताना खुल्या संवर्गातील ९० % जागा त्यांनी आपल्या गुणवत्तेने काबीज केल्या आणि काही लोक त्यांच्याशी खुली स्पर्धा करण्यापेक्षा मागास वर्गावर कुढू लागले. पण आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मणांनी आपले मोर्चे कधीच काढले नाही ना कधी आंदोलन केले.
त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत.
-विशेष म्हणजे या देशात ब्राह्मणांना इतके बडवले जात असतानाही आज देशाची कमांड त्यांच्याच हातात आहे. खरेच मला या समाजाच्या वाटचालीचे नेहमीच कौतुक वाटते.
----बाबा गाढे
अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते

भारतीय राजकारण

#राजकारण #politics
#जनता #भारतीय आहे का #नेता ...
कर भरतेवेळी सगळे भारतीय असतो ... जनतेला सवलती ,न्याय ,हक्क  देताना मात्र #जात धर्म का आड येतो ... पंतप्रधान देशाचे असतात .. मुख्यमंत्री राज्याचा  असतो .. विशिष्ट जाती भाषेचे नाही .. कोण आहेत  दलित नेते ..कोण obc  नेते  ...कोण मराठा ..ब्राह्मण नेते ... ही विभागणी जनतेनेच केली .. कर जनता भरते  मग विशिष्ट जातीचा नेता कसा असू शकतो ..  ते काय त्यांच्या स्व खर्चातून कोणाला सवलती देतात  का मदत करतात ? असं असतं कराडोची संपत्ती झाली कशी असती .... कोणी सत्तेचा लाभ घेऊन आणि कोणी भ्रष्टाचार करून   धनाढ्य झालेत ..तरी यांची  पोट भरली नाही म्हणून  वेतन वाढ सुरूच ... #विद्या

जबाबदारी

स्वतः ची जबाबदारी स्वतः च घ्यायला शिकलेली बरी काही जण वेळे आधी mature होतात आणि काहींना परिस्थिती शिकवते कसं जगायचं।

आरक्षण

#Reservation In INDIA  #मराठाक्रांतीमोर्चा
आता भारतात जातीवर आरक्षण आहे तर जातीवर च आरक्षण मागणार ना समाज ...  आरक्षणाच्या नावाखाली राजकारण नुसतं ... जातीवरून कोण गरीब कोण श्रीमंत कळत नाही.. काही ठरविक काळासाठी केलेलं आरक्षणाचा कायदा ...  कायदाच रद्द व्हावा किंवा आर्थिक निकषांवर आरक्षण असावं ..
जातीवरून  आणि आर्थिक आधारावर जनगणना व्हायला हवी ... पण राजकारणी पोळी कसे भाजणार... असं झालं तर..
#विद्या

आचार विचार

माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते आणि ज्या वातावरणात राहणार तशीच व्यक्ती घडते । आपण कोण तरी समाज मात्र ठरवतं असतो चांगलं वाईट । स्वैराचार आणि  swachdi  जगणं ह्यात अंतर असतं आणि ज्याच त्याला माहिती च असतं काय योग्य काय चूक । शेवटी स्वतः च्या कर्माचे स्वतः धनी  । दुसऱ्यानी कसं वागायचं आपल्या हातात नसलं तरी आपण कसं वागावं हे मात्र आपल्याच हातात असतं । 
#विद्या

Atrocity कायदा गैरवापर

atrocity  कायद्याचा गैरवापर म्हणतात ह्याला...
धर्म जाती वर राजकारण नुसतं... आरक्षण आर्थिक आधारावर मिळावं किंवा प्रत्येक जाती साठी टक्के ठरवलेले बरे...#विद्या 
---------------------
कर्जत  - अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हत्येनंतर कोपर्डी येथील आरोपींबाबतच्या अनेक घटना पुढे येत आहेत. डिसेंबर २०१५ मधील धनराज सुद्रिक मृत्यूची फाइल राज्य शासन पुन्हा उघडणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाची चौकशी सुरू होणार आहे.

कोपर्डी येथील बालिकेच्या अत्याचार हत्या प्रकरणामुळे आता धनंजय सुद्रिक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केला, तर कदाचित बालिकेच्या हत्येचे प्रकरण घडले नसते, असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. १५ डिसेंबर २०१५ रोजी कोपर्डी येथील धनंजय जयवंत सुद्रिक, त्यांचे सहकारी अक्षय गोरख सुद्रिक, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र बाबालाल शिंदेचा चुलतभाऊ शांतीलाल शिंदे विजय शिंदे हे चौघे धनंजयच्या नेटकेवाडी येथील मेहुण्याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यावेळी हे सर्वजण खूप दारू प्यायले होते. रात्री ११ वाजता हे चौघे धनंजयच्या सासूरवाडीला घराच्या छतावर झोपले होते.
धनंजय पहाटे साडेचार वाजता कोपर्डीला आपल्या घरी जाणार होता. धनंजयची बायको नंदा घराच्या छतावर गेली, तेव्हा तो तेथे नव्हता. तिने तेथे झोपलेल्या शांतीलालला विचारले असता धनंजय खाली गेल्याचे त्याने सांगितले. मात्र, धनंजय खालीही नव्हता. घराच्या पाठीमागे आवाज येत असल्याने नंदाने वरून खाली पाहिले असता धनंजय खाली पडला असल्याचे दिसले.
शांतीलाल शिंदे विजय शिंदे यांनी मागील भांडणाचा राग मनात ठेवून धनंजयला छतावरून खाली टाकल्याचा आरोप नंदाने केला. धनंजयला खासगी रुग्णालयात तेथून पुढे बारामतीला उपचारांसाठी नेण्यात आले. उपचारांदरम्यान धनंजयचा तेथे मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू जबर मारामुळे झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आला. मात्र, पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद कशी काय केली गेली याचे गौडबंगाल कायम आहे. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शांतीलाल विजय शिंदे यांची गावात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजावत नव्हते.
पोलिसात तक्रार करू नको, असा दम शांतीलालने दिल्याचे नंदा सांगते. पोलिसांनीही आरोपींना पाठीशी घालून नंदाची तक्रार एेकून घेता आरोपींची बाजू घेतली. आरोपी शिंदे याचे नाव घेतल्यास ते दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा वापर करून तुला कायमचे अडकवतील, अशी धमकी दिली गेल्याचा आरोप नंदा करत आहे.
मोकाट सुटल्याने आरोपी आणखी उन्मत्त झाले. नंतर हे आरोपी नंदाला तिच्या घरच्यांना सांगू लागले की, आम्हीच तुमच्या धनंजयला मारले. आपल्या मुलांच्या जीवाला काही धोका होऊ नये, म्हणून आपण गप्प बसून सगळे दुःख बाजूला सारले. मात्र, शिंदे बंधूंचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. याची दखल पोलिसांसह कोणीच घेतली नसल्याची तक्रार नंदा हिने केली आहे.
नंदाला दोन मुली एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत शिकते, तर दुसरी सातवीत आहे. मुलगा पाचवीत शिकतो. कुळधरण येथे शाळेत ते जातात. त्यांचे रस्त्यात बरे-वाईट केले जाऊ शकते. आपणही रानात मजुरीसाठी एकटे जातो. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आपले पती जाऊन सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होऊन गेला, तरीही न्याय मिळालेला नाही, असे नंदाचे म्हणणे आहे.
#अनामिक #बातमी 

Facebook व्यक्ती आणि प्रवृत्ती

वास्तविक जीवनात ना आंदोलन .. ना tv  किंवा वर्तमान पत्रात जन जागृती केलेले लिखाण ... fb वर चार दहा ओळी लिहायच्या  comment वर चर्चा किती ही गंभीर मुद्दे असले तरी .. like मिळवायचं की झालं.. एवढया वर समाधानी हा मात्र .. ही मंडळी .. 
#विद्या

गणपती

देव्हाऱ्यातल्या गणपतीला पाया पडलो काय लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांग लावावी लागते म्हणून इतर मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतलं काय.. सगळ सारखंच ... पण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मिरवणारे जास्त... देऊळ चित्रपटात अगदी वास्तव दाखवलं आहे..

#विद्या

किसी के खयालों



किसी के खयालों में
इतना भी खो मत जाना
की खुद को ही भुला दो
 #विद्या 

नाती

झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए .. नात्याच्या बाबतीत मात्र वेगळं असतं ..नातं टिकवायचं असेल ... एकाला नमतं घ्यावं लागतं... व्यक्त होण्याने प्रश्न सुटतातही .. कारण तरी कळतं ..रुसव्या फुगव्याच ..  आपण आपला प्रयत्न करावा नाही जमलं तर लांब राहिलेलं बरं ...तसही प्रत्येक नात्या ची किंमत ज्याला त्याला माहिती च असते आणि एकमेकांच्या आवडी निवडी मत आणि विचार ही...समोरच्या व्यक्ती च वागणं ही..
#विद्या

Be as u r

R u perfect ? No then why should one expect others to be perfect.
Be As You are .. !
आपण आहोत तसेच स्वतः ला स्विकारलं तर इतरही स्विकारतात कि .. !
अपूर्णतेही पूर्णते कडे जायचा ध्यास असतो की।
#विद्या

विश्वास

स्वतः वर स्वतःच्या वागण्यावर विश्वास असेल .. ऐकावे जनाचे करावे मनाचे .. ह्या प्रमाणे वागायला ..कोणत्याही गोष्टीवर विचार करून अंतिम निर्णय घ्यायला स्वतंत्र्य असतो .. निर्णय हि स्वतः चा मग परिणामाची जबाबदारी हि स्वतः ची । #विद्या

नातं

कोणतं हि नातं असो टाळी एका हाताने वाजत नाही ...नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांवर असते ... समज गैरसमज प्रत्यक्ष बोलल्या शिवाय सुसंवाद साधल्या शिवाय दूर होत नाहीत ...असं  माझं मत .

Origami art Butterfly


प्रस्तावना

तुमच्या लेखन शैली त ताकद असेल तर प्रस्तावनेची काय गरज  ...मानधनाच्या नावाखाली लुटतात नव साहित्यिकांना hardcopy book प्रकाशित करताना #विद्या

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .