आरक्षण

खालील लेखावर मत
----------------
#आरक्षण  आर्थिक आधारावर  आणि ठराविक काळासाठी असावं
---------
आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले  दलित स्वतः ला दलित म्हणून आरक्षणाच्या कुबड्यावर जगता आहेत ... तेही  बहूसंख्य कर देतात त्यावर ...ब्राह्मण या समाजाने आंदोलन काढलं तर जाती वर आरक्षण मुक्त भारत साठी असेल ... तेव्हा करतील का हे दलित समर्थन । # विद्या 
--------------
#लेख
*वाचा ब्राम्हण समाजाविषयी एका दलित अभ्यासकाचे जाहीर निरीक्षण*
मला ब्राह्मण बांधवांचे नेहमी कौतुक वाटते !!
- देशातील ब्राह्मण समाज.
लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्राह्मण मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले.
-कोणतेही घोषित आरक्षण नसताना खुल्या संवर्गातील ९० % जागा त्यांनी आपल्या गुणवत्तेने काबीज केल्या आणि काही लोक त्यांच्याशी खुली स्पर्धा करण्यापेक्षा मागास वर्गावर कुढू लागले. पण आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मणांनी आपले मोर्चे कधीच काढले नाही ना कधी आंदोलन केले.
त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत.
-विशेष म्हणजे या देशात ब्राह्मणांना इतके बडवले जात असतानाही आज देशाची कमांड त्यांच्याच हातात आहे. खरेच मला या समाजाच्या वाटचालीचे नेहमीच कौतुक वाटते.
----बाबा गाढे
अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .