साहित्य रसिक म्हणून अनुभवलेलं ९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
साहित्य रसिक म्हणून अनुभवलेलं ९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत ग्रंथ दिंडीला सुरवात झाली...
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
ह्या वर्षी पहिल्यांदाच संमेलन गीत लिहिलं गेलं ते गीतकार आनंद पेंढारकर यांनी आणि पहिला गझल कट्टा सुरु झाला अखिल भारतीय संमेलनाच विशेष !
आनंदाची गोष्ट म्हणजे संमेलन महाराष्ट्रात होते
शिवाय ह्या वेळी अध्यक्षाची निवडही उत्तम होती . कारण संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे वादग्रस्त विधानापासून लांब होते .
भव्य दिव्य सोहळा तीन दिवस सुरु होता. संमेलनात रांगोळी ,मूर्तिकला ,साहित्य संस्कृतीचं छान दर्शन घडवलं.
एकाच वेळी कवी संमेलन तर कुठे गझल कट्टा तर काही ठिकाणी परिसंवाद ,बोलीभाषेचा जागर सुरु होता . जमेल तेवढा सहभाग घेण्याचा प्रयत्न केला . वेळापत्रक माहिती असणं जास्त जरूर आहे हे ह्या वेळी कळलं . सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव केला होता पण मागच्या दोन वर्षापासून काही मान्य केला नाही ना कोणी राजकारणी नेत्यांनी मध्यस्ती केली .
साहित्यिक वाचक प्रकाशकांचा दुवा असणारं मराठी भाषेचा प्रसार करणार ग्रंथ दालन एक आकर्षण . मराठी भाषा जास्त बोलली जावी वाचक संख्या वाढावी म्हणून प्रत्येक जण
आपल्या परीने झटत होते . पण खूप मोठं ग्रंथ दालन एक फेरफटका मारणे हि कठीण . कुठे कोणता stall आहे याची माहिती हि बाहेर कुठे लावली नव्हती .हे खटकलं . सामाजित माध्यमाचा पुरेपूर वापर करायला हवा असं अजूनही वाटतं . तंत्रज्ञान बदलतं आहे तसे बदलायला हवं . facebook आणि you tube वर live प्रक्षेपण व्हावं हि माफक अपेक्षा आहे बघू कधी पूर्ण होतेय . साहित्यिक उपक्रमा बद्दल सांगायचं झालं तर ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या मोफत ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देते .
बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वरूप ओळखून पुस्तक हि आता ebook स्वरुपात प्रकाशित करण्यात येतात . Esahity उपक्रमा बद्दल सांगायचं तर साहित्यिकांच्या मदतीने ई साहित्य प्रतिष्ठान मोफत ebook सेवा वाचकांना देते .आधी email , website वर मिळत होती आता whatsapp वर हि सुरु करण्यात आली आहे . या दोन्ही स्तुत्य उपक्रमामुळे देशा विदेशात वाचक वर्ग वाढला आहे आणि शिवाय नव्या साहित्यिकांच्या ओळखी हि वाचकांना होतात . मराठी पाऊल पढते पुढे बोलायला हरकत नाही . मराठी माणुस मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देत नाही परिस्थिती बिकट आहे अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी उल्लेख केला शिवाय वेळे नुसार शाळेतलं शिक्षण हि बदलायला हवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा शिकवल्या जाव्यात ह्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेलं हि आशा व्यक्त केली .
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुने नवीन मित्रमंडळीशी भेटी गाठी झाल्या . हे खासच म्हणायचं .साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल आणि भोजनाची ही चांगली व्यवस्था होती. एकूण वाचक म्हणून अनुभव चांगला होता . दोन दिवस अनुभव घेतलेल्या संमेलनाची धुंदी अजून उतरली नाही . एवढचं सांगीन .
~ विद्या
मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत ग्रंथ दिंडीला सुरवात झाली...
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
ह्या वर्षी पहिल्यांदाच संमेलन गीत लिहिलं गेलं ते गीतकार आनंद पेंढारकर यांनी आणि पहिला गझल कट्टा सुरु झाला अखिल भारतीय संमेलनाच विशेष !
आनंदाची गोष्ट म्हणजे संमेलन महाराष्ट्रात होते
शिवाय ह्या वेळी अध्यक्षाची निवडही उत्तम होती . कारण संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे वादग्रस्त विधानापासून लांब होते .
भव्य दिव्य सोहळा तीन दिवस सुरु होता. संमेलनात रांगोळी ,मूर्तिकला ,साहित्य संस्कृतीचं छान दर्शन घडवलं.
एकाच वेळी कवी संमेलन तर कुठे गझल कट्टा तर काही ठिकाणी परिसंवाद ,बोलीभाषेचा जागर सुरु होता . जमेल तेवढा सहभाग घेण्याचा प्रयत्न केला . वेळापत्रक माहिती असणं जास्त जरूर आहे हे ह्या वेळी कळलं . सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव केला होता पण मागच्या दोन वर्षापासून काही मान्य केला नाही ना कोणी राजकारणी नेत्यांनी मध्यस्ती केली .
साहित्यिक वाचक प्रकाशकांचा दुवा असणारं मराठी भाषेचा प्रसार करणार ग्रंथ दालन एक आकर्षण . मराठी भाषा जास्त बोलली जावी वाचक संख्या वाढावी म्हणून प्रत्येक जण
आपल्या परीने झटत होते . पण खूप मोठं ग्रंथ दालन एक फेरफटका मारणे हि कठीण . कुठे कोणता stall आहे याची माहिती हि बाहेर कुठे लावली नव्हती .हे खटकलं . सामाजित माध्यमाचा पुरेपूर वापर करायला हवा असं अजूनही वाटतं . तंत्रज्ञान बदलतं आहे तसे बदलायला हवं . facebook आणि you tube वर live प्रक्षेपण व्हावं हि माफक अपेक्षा आहे बघू कधी पूर्ण होतेय . साहित्यिक उपक्रमा बद्दल सांगायचं झालं तर ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या मोफत ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देते .
बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वरूप ओळखून पुस्तक हि आता ebook स्वरुपात प्रकाशित करण्यात येतात . Esahity उपक्रमा बद्दल सांगायचं तर साहित्यिकांच्या मदतीने ई साहित्य प्रतिष्ठान मोफत ebook सेवा वाचकांना देते .आधी email , website वर मिळत होती आता whatsapp वर हि सुरु करण्यात आली आहे . या दोन्ही स्तुत्य उपक्रमामुळे देशा विदेशात वाचक वर्ग वाढला आहे आणि शिवाय नव्या साहित्यिकांच्या ओळखी हि वाचकांना होतात . मराठी पाऊल पढते पुढे बोलायला हरकत नाही . मराठी माणुस मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देत नाही परिस्थिती बिकट आहे अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी उल्लेख केला शिवाय वेळे नुसार शाळेतलं शिक्षण हि बदलायला हवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा शिकवल्या जाव्यात ह्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेलं हि आशा व्यक्त केली .
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुने नवीन मित्रमंडळीशी भेटी गाठी झाल्या . हे खासच म्हणायचं .साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल आणि भोजनाची ही चांगली व्यवस्था होती. एकूण वाचक म्हणून अनुभव चांगला होता . दोन दिवस अनुभव घेतलेल्या संमेलनाची धुंदी अजून उतरली नाही . एवढचं सांगीन .
~ विद्या
Subscribe to:
Posts (Atom)




