follow. your own religion

Christian follow their own religion and Muslim too.But Hindu some follow some don't and remaining follow all religion culture . Celebrate birthday in Christian way by wipe of candles or else do RiP Rip after someone dies 😎

#vidya

संस्कृती

वाढदिवसाला केक हवा  च  ना हिंदूंना पण ... शास्त्र असतं ते .. आपल्या धर्मात ओवाळणी करायची प्रथा आहे ... दिवे लावायचा सण असतो .. तरी  दुसऱ्या धर्माच्या पद्धती मेणबत्ती विजवणे यात धन्यता मानतात  ....केक तोंडाला  फासणे .. हे तर नवीनच .. आज काल तर प्रतिमा (वाढदिवस असणाऱ्याची किंवा पूर्ण कुटूंबाची  ) ही असतात केक वर त्यानंतर केक कापतात .... 😎😎

अनुकरण करायला तर लहानपणीच शिकतात सगळेच जण. म्हणून काही मोठं झाल्यावर सारासार विचार न करता सगळे करतात म्हणून आम्ही पण त्यातले असलं कसलं जगणं ?
स्वतःच्या संस्कृती म्हणजे कवडीमोल .. ना वेशभूषा  ना स्वतःच्या धर्मा प्रमाणे जगणं.... आधीच त्या पहिल्या शिक्षण मंत्रीने फक्त अल्पसंख्याक समाजाने  स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायचं इतरांनी नाही हा कायदा अजूनही अस्तित्वात आहे .... आमच्या शाळेच नावं ब्राह्मण विद्यालय तिथे तरी भगवद्गीता , रामायण , 
गणपती अर्थवशीर्ष , रामरक्षा  मूल्यशिक्षणात तरी होतं. देशाचं रक्षण करायला सैनिक असतात ते क्षत्रिय म्हणायचे. जात उंबरठ्या बाहेर नाही पण घरात तरी हवीच की ती ही जन्माने नाही कर्माने .. जो इतरांचं रक्षण करतो तो क्षत्रिय ..
जो धर्माचं ज्ञान देतो तो ब्राह्मण. क्षत्रिय चुकले तर ब्राह्मण समाज रक्षण करतो आपल्या समाजाचं.वैश्य व्यवहार कौशल्य असतं. शूद्र इतरांची सेवा करतात . 
मग त्यात साफसफाई करणारे , वैद्यकीय सेवा देण्याऱ्या (सुश्रुषा )परिचारिका ही आल्यात. कोणीही परिपूर्ण नसतं आणि एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ  
याप्रमाणे आयुष्य जगलं तर समस्या ही कमी होतील . समाज आणि स्वतः चा विकास होईल. प्रत्येक मंदिरात  धर्म ग्रंथांचं वाचन व्हायला हवं. भजन ,किर्तन सण सुद्धा साजरे झाले पाहिजेत. Iskon कृष्ण भक्तांची संस्था सनातन धर्माचा प्रचार करत आहे. तिथली धार्मिक संस्कृती सर्व मंदिरात झाली तर दानपेटी भरण्या पेक्षा समाज विकास करण्यात धडपड करणारी माणसं वाढतील आणि माणूस म्हणून सुध्दा घडतील. नाहीतर धर्म माहीत नसलेला माणूस जनावरच की  तामसी गुण वाढणारा सात्विक वाटा माहिती नसलेला.राजस असेल तर स्वतःच्या सुखात आत्ममग्न असलेला. समाजासाठी असून नसून सारखीच ही माणसं . मोजकीच माणसं असतात जी धडपडतात  समाजासाठी .. असे नेतृत्व धार्मिक , अध्यात्मिक , व्यावहारिक , सामाजिक पातलीवर लाभो आपल्या देशाला ही देवाकडे प्रार्थना. मग स्वतःचा आणि देशाचा दोघांचाही विकासातच भर पडेल की .

#vidyamslife 

२५.७ २०२१

मानसिक आधार

कोणत्याही राजकीय पक्षाचे असो कार्यकर्ते सामान्य माणूस असतात . 

ह्यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांने वयस्कर नागरिकांना लस ज्यांना मिळाली नाही त्यांच्या साठी लस उपलब्ध केली ती ही सरकारी हॉस्पिटलमध्ये.  त्यामुळे वडिलांना लस मिळाली. 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  भाऊ आजारी होता एप्रिल मे मध्ये  तेव्हा नवीन आजाराबद्दल माहिती दिली. डॉ ना काय विचारायचं हे सांगितलं . अज्ञानात सुख नसतं हेच खरं !

घड्याळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  वडलांच्या ओळखीचे होते त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल ! 

काही फेसबुक वर न भेटलेल्या आणि भेटलेल्या मित्रमंडळी नि मानसिक आधार दिला.

डॉ दिवस होता तेव्हा सांगायचं राहील 

डॉ भोसले यांनी भावाला जीवनदान दिलं.

सध्याच्या परिस्थितीत अशी असंख्य माणसं आहेत जी मदत करत आहेत .

🙏 
लवकर सगळं ठीक होवो हीच अपेक्षा ! 
गणपती बाप्पा मोरया !

© #vidyamslife

११.७.२०२१

विधिलिखित

विधिलिखित

आयुष्यात जे जे घडतं ते विधिलिखित असतं! भगवद्गीते मध्ये लिहिलं आहे कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची अपेक्षा करू नये म्हणून. ओर्कुट च्या काळात सुद्धा मैत्री व्हायची की एकमेकां सोबत! ओर्कुट माध्यम असून सुद्धा काहींच्या भेटी फेसबुक वर झाल्यात . जे घडतं ते वेळेवर वेळे आधी काहीच घडत नसतं . मग त्यात आपल्या आयुष्यातली वळणं असो किंवा भेटीगाठी. ;  ज्या खऱ्या आयुष्यातल्या असो  की सामाजिक माध्यमातल्या सगळं विधिलिखितच . मग त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाही आल्यातच. एक वळण , एक निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कधी काही निर्णय स्वतः घेतलेले असतात तर कधी इतरांनी किंवा परिस्थितीने! आपण आपलं आपल्या वाटेवर चालत रहायचं . जे जे मिळालं जे गवसले  ते स्वीकारायचं जे हरवले आहे , जे निसटलं आहे त्याला मागे सोडायचं! भूत असो वा भविष्य सगळ्यांच्या पाऊलखुणा वर्तमानातच उमटल्या जातात. म्हणून आज आताचा क्षण मनसोक्त जगून घेणं  ; सुख असो वा दुःख स्वीकार करणं त्यांना एक समान मानने इतकं मात्र आपल्याच हातात असतं.  सध्याच्या जीवनात शारीरिक संघर्ष नसला तरी मानसिक संघर्ष मात्र आहेच . आपल्या समाजात दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात काहींना खूप रस असतो असं म्हणू की त्यांना दुसरा उद्योगच नसतो. फुकटचे सल्ले देणं ही आलं त्यात. एखाद्या क्षेत्राबद्दल काडीची महिती नसते तरी प्रोत्साहन द्यायचं सोडून व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण केलं जातं , नकारात्मकता पसरवली जाते.अश्या वेळी आपण ठाम रहाणं गरजेचं . ऐकावे जनाचे करावे मनाचे . आपल्या वागण्यातून समाजाला काही त्रास नाही  ; आपण आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपण स्वीकारली  ;  तर इतरांची मत कवडीमोल ठरतात. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं ध्येय आज ना उद्या मिळतंच . नव्या गोष्टी शिकत रहायचं. स्वतःशीच स्वतःची  स्पर्धा करायची . जीवन जगण्यासाठी असतं घालवण्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं .मनसोक्त आयुष्य जगायचं. स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करण्यासाठी धडपडायचं. कधी स्वतः साठी , कधी इतरांसाठी आयुष्याचे क्षण क्षण वेचायचे आणि आयुष्य सुंदर करायचं. आयुष्यात कोणाला स्पष्टीकरण द्यायचं नाही आणि जे जे आपल्याला गुण दोषासकट स्वीकारतील त्यांना सोबती म्हणून निवडायचं. आयुष्याचा प्रवासात स्वतःचे सूर शोधूनी आयुष्य सुमधुर करायचं.

११.७.२०२१
विद्या

 © #vidyamslife

मनोरंजन

मराठी किडा या youtube channel  वर सर्व सामान्य  बायकांना विचारण्यात आलं तुम्ही मालिका का बघता त्यावर त्या बोलल्या दुसऱ्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहण्यात ऐकण्यात रस असतो म्हणून .. निव्वळ मनोरंजन मालिका बघणारे खूप आहेत .. वेळ घालवण्यासाठी ही मालिका बघितल्या जातात.. मालिका मनोरंजन करण्यासाठी असतात , संस्कार आणि संस्कृती च दर्शन घडवणाऱ्या मालिका बनवणं सध्या तरी बंद आहे ! त्या पेक्षा दक्षिण भारतीय चित्रपट , youtube चांगलं 😎  मनोरंजन ! आम्ही tv बघणं सोडून दिलं मालिका आवडली तर त्या त्या वेबसाईटवर बघतो ! Otp platform पण नाही वापरत ! छंद , वाचन आणि नवीन गोष्टी शिकण्यात कधी वेळ निघून जातो आपला तरी ☺️
#vidya


 

टीव्ही न बघणे

आज काल टिव्ही न बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे ...त्यात तरुण पिढी येते , ज्यांच्या कडे मनोरंजनाची वेगळी माध्यम आहे असेही ... स्वतःच्या कामात व्यस्त असणारे ही .. कलेमध्ये स्वतःच मन रमवणारे ही आलेच !
#vidya

movie must watch






An artist painting a mural on a new hospital wing falls for the project's architect but worries he may not want to be with her if she reveals the unfortunate story behind her secret bucket list.



मनतरंग ३

शब्दत्रिवेणी

life is bliss




मनतरंग १


मनतरंग ३






निरोप

निरोपाचा क्षण 
हळवा होतो..
डोळ्यासमोर आपलं माणूस असतं..
भेटीचे क्षण खास होतात..
निशब्दता अंतरी पसरते..
नजरभेटीचे खेळ सुरू होतात..
भावना अंतरी दाटतात..
नजरेनेच संवाद सुरू होतो..
अश्रूंचा बांध कोसळतो..
श्वासांची गती मंदावते..
हृदय धडधडते...
हात हातात घेऊन ..
काळजी घे..
सांभाळून जा..
बोलून निरोप घेतला जातो..
भावना अबोल होतात ..
निशब्दता खोलवर पसरते..
निरोप घेणे जड जातं   ..
वळून मागे बघायचं नाही हे ही मनात ठरवलं जातं..
पुन्हा भेटू या आशेवर ..
निरोप घेतला जातो..
आठवणींमध्ये भेटीला उजाळा देतो..

© #vidyamslife
८.७.२०२१


अजनबी हिंदी कविता




दोस्ती तो अजनबी लोगो से ही होती है 

.....

बातों बातों में दोस्ती हो जाती है
वह अजनबी भी अब जाना पहचाना लगता है ..
कभी अपने पराये हो जाते है 
और कभी पराये अपने हो जाते है
वक्त के साथ साथ रिश्ते बनते है 
बिगड़ ते है...
जो समज पाये हमें ...
उनसे बड़े गहरे रिश्ते हो जाते है..

विद्या
८.७.२०२१

© #vidyamslife

लोभस

लोभस होती ती 
जी जीवापाड जपायची कुटूंबाला 
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 
राब राब राबायची घरासाठी
एक दिवशी मृत्यू दारात आला
आणि दूर मायेच्या सावलीला घेऊन गेला..
मागे उरला तिच्या आठवणींचा हुंदका 
प्रेमळ जिव्हाळा ..
लोभस प्रेमळ चेहरा ...
मायेचा तो स्पर्श कोवळा ...

 © vidyamslife

८.७.२०२१



प्रश्न

साने गुरुजी यांना आपण गुरुजी म्हणतो मग सर हा शब्द कुठून आला ? हे मराठी शब्द तरी आहेत का ?? आधीच्या काळात शिक्षिकांना गुरुजी आणि शिक्षिकेला बाई म्हणून संबोधले जायचे मग sir आणि Mam किंवा Madam हे शब्द कुठून आले ?  
#vidya

धर्म

धर्म अनुभूती में है ! धर्म के पथ पर चलना अनिवार्य है ! 
ज्ञानयोग,भक्तियोग , कर्मयोग भगवान श्रीकृष्ण ने ने बताये हुए तीन मार्ग है !

#vidya

विसावा



थकल्या जीवा..

जरा विसावा घे ...

वळण आणि वादळ येतात जातात आयुष्यात...

चढ उतार ही सुरूच असतात...

मनाला शांतता लाभेल जिथे ...तिथे जा.. 

कधी मंदिरात ..

कधी निसर्गाच्या कुशीत विश्रांती घे..

सगळं काही विसरून 

शांत चांदण्या खाली अंगणात निज.. (विद्या)

मनाला सुखद शांतता लाभेल ...

असा एक तरी क्षण अनुभव ..

रातकिड्याचं गुंजन ऐक

सृष्टीच्या संगीतात हरवुनी जा स्वतःला ...

आपलं असं स्वतःच वेगळं अस्तित्व आहे..

ते जप ..

ते जाण ...

क्षणभर विश्रांती नंतर 

जीवन उत्सव  नवचैतन्याने साजरा करायला सज्ज रहा ..

~ विद्या

३.७.२०२१

© #vidyamslife


मालिका

श्रीयुत गंगाधर टिपरे या सारख्या चांगल्या मालिका  व्हायच्या याच कारण लेखकाकडे सत्ता असायची आणि आता त्या tv चॅनल वाल्यांकडे आहे ! ह्याच एका कारणामुळे गुरू ठाकूर यांना आताच्या मालिका लिहिण्यात काम करण्यात रस राहिला नाही .. मागे मुलाखत ऐकली होती ! ह्या बदलामुळे ना लेखक सुखी ना रसिक ! पुन्हा आधी सारखे दिवस येवोत कलेला मान मिळो .. !
#vidyamslife

मानसिक आरोग्य आणि समाज

 मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरूकता कमी आहे. जितक्या सहज शारीरिक आरोग्य बिघडलं की लगेच व्यक्ती डॉ कडे जाते तितक्या सहज मानसोपचार तज्ञां कडे जायचा विचार सुद्धा करत नाही ना स्वतः मानसिक तणावाखाली असणारी व्यक्ती ना नातेवाईक! आपल्याकडे तणावाची कारणं कधी आपण आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून किंवा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली नाही म्हणून समाज किंवा घरचेच मानसिक त्रास देण्यात पुढे असतात. उदाहरण द्यायचं तर नोकरी मिळत नसते तेव्हा आधार द्यायचं सोडून सतत घालून पाडून बोलणं . मार्ग काढणं आणि समस्या सोडवणं करण्यापेक्षा समाज आणि नातेवाईक पुढेच असतात.सतत स्वतःची तुलना करणं इतरांसोबत हे ही कारण असतं मानसिक तणावाचं. घाई घाई नुसती घाई कुठे जायचं असतं कोणाशी स्पर्धा करतोय .. कोणाला सिद्ध करून दाखवायचं असतं. मन , शरीर आणि बुद्धी यांचा समतोल राखणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ञांची किंवा योग्य गुरू ची मदत घेणं कधीही उत्तम. जसं कौटूंबिक डॉ ठरलेले असतात तसं मानसिक तणाव आला की काय करावं यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपल्याला आधीच माहिती हवी . मग ती डॉ असो किंवा आपल्या जवळची मैत्रीण किंवा मित्र . बोलण्याने व्यक्त होण्याने सुद्धा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. 
व्यक्त व्हा ! समाजात जागरूकता पसरवा! शाळेत  ,महाविद्यालयात सुद्धा यावर चर्चा व्हायला हव्यात! 
तरच आपला समाज सुदृढ होईल खऱ्या अर्थाने ! 

 © #vidyamslife 


बालपण कविता

बालपण 
एक खळखळणारा झरा...
त्याला बांधून ठेवू नये ...
बालपण वाहत जाणारी नदी ...
निखळ निर्झर...

बालपण 
निरागसतेचा गंध ...
मनास भुरळ पाडणारं 
हवंहवंसं वाटणारं..
मनाला प्रसन्न करणारं..
चैतन्यमय जगाची प्रचिती देणारं...
 © #vidyamslife

१.७.२०२१

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .