विधिलिखित

विधिलिखित

आयुष्यात जे जे घडतं ते विधिलिखित असतं! भगवद्गीते मध्ये लिहिलं आहे कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची अपेक्षा करू नये म्हणून. ओर्कुट च्या काळात सुद्धा मैत्री व्हायची की एकमेकां सोबत! ओर्कुट माध्यम असून सुद्धा काहींच्या भेटी फेसबुक वर झाल्यात . जे घडतं ते वेळेवर वेळे आधी काहीच घडत नसतं . मग त्यात आपल्या आयुष्यातली वळणं असो किंवा भेटीगाठी. ;  ज्या खऱ्या आयुष्यातल्या असो  की सामाजिक माध्यमातल्या सगळं विधिलिखितच . मग त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाही आल्यातच. एक वळण , एक निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कधी काही निर्णय स्वतः घेतलेले असतात तर कधी इतरांनी किंवा परिस्थितीने! आपण आपलं आपल्या वाटेवर चालत रहायचं . जे जे मिळालं जे गवसले  ते स्वीकारायचं जे हरवले आहे , जे निसटलं आहे त्याला मागे सोडायचं! भूत असो वा भविष्य सगळ्यांच्या पाऊलखुणा वर्तमानातच उमटल्या जातात. म्हणून आज आताचा क्षण मनसोक्त जगून घेणं  ; सुख असो वा दुःख स्वीकार करणं त्यांना एक समान मानने इतकं मात्र आपल्याच हातात असतं.  सध्याच्या जीवनात शारीरिक संघर्ष नसला तरी मानसिक संघर्ष मात्र आहेच . आपल्या समाजात दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात काहींना खूप रस असतो असं म्हणू की त्यांना दुसरा उद्योगच नसतो. फुकटचे सल्ले देणं ही आलं त्यात. एखाद्या क्षेत्राबद्दल काडीची महिती नसते तरी प्रोत्साहन द्यायचं सोडून व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण केलं जातं , नकारात्मकता पसरवली जाते.अश्या वेळी आपण ठाम रहाणं गरजेचं . ऐकावे जनाचे करावे मनाचे . आपल्या वागण्यातून समाजाला काही त्रास नाही  ; आपण आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपण स्वीकारली  ;  तर इतरांची मत कवडीमोल ठरतात. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं ध्येय आज ना उद्या मिळतंच . नव्या गोष्टी शिकत रहायचं. स्वतःशीच स्वतःची  स्पर्धा करायची . जीवन जगण्यासाठी असतं घालवण्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं .मनसोक्त आयुष्य जगायचं. स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करण्यासाठी धडपडायचं. कधी स्वतः साठी , कधी इतरांसाठी आयुष्याचे क्षण क्षण वेचायचे आणि आयुष्य सुंदर करायचं. आयुष्यात कोणाला स्पष्टीकरण द्यायचं नाही आणि जे जे आपल्याला गुण दोषासकट स्वीकारतील त्यांना सोबती म्हणून निवडायचं. आयुष्याचा प्रवासात स्वतःचे सूर शोधूनी आयुष्य सुमधुर करायचं.

११.७.२०२१
विद्या

 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .