विसावा



थकल्या जीवा..

जरा विसावा घे ...

वळण आणि वादळ येतात जातात आयुष्यात...

चढ उतार ही सुरूच असतात...

मनाला शांतता लाभेल जिथे ...तिथे जा.. 

कधी मंदिरात ..

कधी निसर्गाच्या कुशीत विश्रांती घे..

सगळं काही विसरून 

शांत चांदण्या खाली अंगणात निज.. (विद्या)

मनाला सुखद शांतता लाभेल ...

असा एक तरी क्षण अनुभव ..

रातकिड्याचं गुंजन ऐक

सृष्टीच्या संगीतात हरवुनी जा स्वतःला ...

आपलं असं स्वतःच वेगळं अस्तित्व आहे..

ते जप ..

ते जाण ...

क्षणभर विश्रांती नंतर 

जीवन उत्सव  नवचैतन्याने साजरा करायला सज्ज रहा ..

~ विद्या

३.७.२०२१

© #vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .