मन :शांती आणि कुटुंब

घरातली व्यक्ती चिडचिड करणारी असेल ...अस्वस्थ असेल ..दुसऱ्यांना समजून घेणारी नसेल. सतत वाद घालण्यात पटाईत असेल तर एकच उपाय यावर

दुर्लक्ष करणं! 😀 स्वतःची मन:शांती महत्त्वाची किंवा त्यालाच प्राधान्य द्यावं की! नाहीतर दगडावर डोकं आपटलं की आपल्यालाच लागतं त्यातलाच प्रकार असतात हे!

उतार वयात माणूस अस्वस्थ असेल तर समजून जायचं  आयुष्य जगायची पद्धत चुकली त्याची ! 

#vidya

महाराष्ट्र राजकारण

युती मध्ये हे मतभेद होते म्हणून एकत्र नाहीत!

मेट्रो कार शेड प्रकल्प ला स्थगिती दिली आरे वाचली झाडे  वाचली हे योग्य झालं! औद्योगिकरण आणि विकासात निसर्गाची हानी कशाला ..?

दुसरं बुलेट train प्रकल्प रद्द होणार असेल पुढे तर योग्य च आहे की! गुजरात मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काय उपयोग महाराष्ट्राला !

महाराष्ट्र सरकार

हे नवीन मुख्यमंत्री निवडणूक कोणा विरुद्ध लढले होते ! सत्तेसाठी कायपण ! 😡युतीची मत घेऊन विरोधकांसोबत गेले ! जनतेची फसवणूक करून किती वर्षे टिकवणार आहेत हे सरकार !

मतदान

आपण मतदान केलेले  राजकीय नेते एकतर सत्तेत असतात नाहीतर विरोधक म्हणून भूमिका राबवतात!
दोन्ही बाजू महत्वाच्या! आपलं मतदान वाया गेलं असं नसतं! जनतेची काम करावी इतकी अपेक्षा असते सामान्य माणसांची! सत्ते स्थापने साठी कोणीही गणिते मांडून कधीही सरकार स्थापन करू शकतं!फक्त शपथ घेऊन कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतं नाही बहुमत सिद्ध करावा लागतो नाहीतर ते सरकार पडतं! एकतर राष्ट्रपती राजवट लागते किंवा पुन्हा निवडणूक होते! जनतेचं काम समूहाने एकत्र येऊन आपली काम या लोकां कडून करून घेणं असतं फक्त एक दिवस मतदान करणं नसतं मग ते सत्तेत असो वा विरोधी पक्षात!  #vidya

Diary Nov 19

मतदान करून झालं जनतेचं... आता तरी काम सुरू करा! किती ते सत्ताकारण !
मनोरंजन सुरू आहे नुसतं!
....
ते बहुमत सिद्ध करण्यासाठी सारखं सारखं पत्रकार परिषद घेणं , बातम्या मध्ये झळकत राहणं गरजेचं असतं का?
शास्त्र असतं ते !😂😀
.....
नैतिकतेच्या गोष्टी का करत आहेत हे राजकारणी ??
विरोधी मत असणारे एकत्र यायला तयार होतात त्याच काय! #सत्तेसाठी_कायपण
😁😀🤣
.....

जनतेला पोपट
बनवणाऱ्यांचा 'पोपट 'झाला म्हणायचा ! #महाराष्ट्र सत्ता संघर्ष
घुसळून काढतो आहे सगळ्यांना !
....
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ !
#maharashtrapolitics
......
चाणक्य नीती और स्वातंत्र्यवीर विचारधारा देश की प्रगती.
....
दोघांचं भांडणं तिसऱ्याचा लाभ ☺️
....
आता fb story मध्ये गाणी पण share करू शकतो !☺️
#fb #newfeature
....
समविचारी राजकीय नेत्यांच पटत नाही इतकी वर्षे सोबत राहून ही आणि चालले आहे स्थिर सरकार च स्वप्न बघायला ते ही विरुद्ध विचार करणाऱ्या पक्षा सोबत !
...
कोण खरं बोलतं कोण खोटं माहीत नाही ! पण बीजेपी शिवसेना एकत्र यावेत हा जनादेश होता! त्यांनी मतभेद विसरून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं असं वाटतं ! नाहीतर आहेत पुन्हा निवडणुका !
...
कर्नाटका मध्ये तर एकच कुमार स्वामी होते आणि आपल्या महाराष्ट्रात एका पेक्षा अधिक म्हणायचे.. जिथे प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री व्हावा  स्वप्न आहे !सत्तेसाठी हट्ट करणारे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी तितकेच प्रयत्न केले असते तर अजून मत मिळाली असती की यांना!
....

रोज जनतेचा पोपट करणारे स्वतःचाच पोपट करून घेत आहेत एकमेकांकडून!
....
मला 'मुख्यमंत्री' व्हायचंय ! चित्रपट बनवायचं script तयार होतंय महाराष्ट्रात !(बहुमत नसलं तरी )😄🤣
....
राजकारण ऐसेची नाव 🤣😄 शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं होतं राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री व्हायला तयार होती पण काँग्रेस ने अडवलं ! 🤣😄 सगळे विरोधी मत असणारे एकत्र आले की असच होणार की ! कुमारस्वामी उत्तम उदाहरण काही काळ सत्ता उपभोगतात मग पुन्हा निवडणुका !

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल नाहीतर जनतेची फसवणूक नक्की !

राष्ट्रपती राजवट येवो पुन्हा निवडणूक होवो !
...

निवडणूक आधी युती कशाला केली? एकत्र यायचं नव्हतं तर!  फसवणूक आहे मतदारांची!
.....
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो ना शत्रू ! सत्तेसाठी कायपण !
....
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
....
देशाचं मोदी सरकार एक एक मोठे निर्णय घेऊन मोकळे होतात मग जम्मू काश्मीर असो अयोध्या मंदिर असो!👏👏👏
...
#अयोध्या
राम मंदिर तयार होणार आता !
...

विकासाचं राजकारण करून मत घेतली अजून सरकार बनवायला भाजपा सेना तयार नाही !  किती तो अहं!अडीच वर्षे दोघांनी सरकार चालवावं की!
.....
बाहेरच्या देशात तर झाडं एका ठिकाणा वरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात लावायला मुळासकट मग तशी व्यवस्था आपल्याकडे कधी येणार! वृक्ष तोड थांबेल आणि वृक्षारोपण होईल की त्याच झाडाचं!
...

बदलतं जग

काल बाजूच्या इमारतीतले पांडुरंग शास्त्री आठवले यांचे स्वाध्यायी घरी आलेले . नवीन उपक्रम होता त्यांचा भगवद्गीता बद्दल माहिती देणे ..निस्वार्थी पणे ओळखीच्या लोकांना भेटणे. नाहीतर आज काल कोणी कोणाकडे कामाशिवाय जात नाही. आधी सारखं काहीच राहिलं नाही.आवडीने माणसं  भेटायची बोलायची. काय काम आहे असं कोणी बोलायचं नाही..निव्वळ गप्पागोष्टी असायच्या. इमारतीत नाहीतर सगळ्यांची दार बंद कोण आहे कोण गेलं ते सुद्धा कळत नाही.
#vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .