रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जवळची असतात , समजूनही घेतात , मानसिक आधार ही देतात. समाजात कसं वागावं कसं नाही याचं भान ही असतं म्हणून काही नाती जुळतात आणि घट्ट होतात . आयुष्यभराचे सोबती होतात. त्यांना जपायचं इतकंच आपल्या हातात असत. निस्वार्थी मनाने जुळलेली नातीच खरी असतात. नाहीतर नातेवाईक कितीही रक्ताची नाती असली तरी काही खेकड्याची जात असतात दुसऱ्याचा विकास झालेला बघून जळणारी. तर काही सतत टोचून बोलणारी एखादी समस्या असेल तर सोडवण्यासाठी मदत न करता आगीत तेल घालून मानसिक त्रास देणारी . असली नाती नसलेलीच बरी. मनाचं connection झालं नसेल तर समजून घेण्याची अपेक्षा तरी कशाला करायची.
© Vidya m s

0 comments:
Post a Comment