post 6

 चलती का नाम जिंदगी! कटपूतळ्यांचा खेळ तो ही काही वेळा साठी ! 

.....
आयुष्यात बदल अनिवार्य असतात. कधी आपण लगेच स्वीकारतो कधी वेळ लागतो .सगळे मनाचे खेळ. मन  दुसऱ्याला न दिसणारं आपलं अस्तित्व.
मन विचार करत कधी चांगले कधी वाईट. कधी भूतकाळात रमत तर कधी भविष्य काळात रमत.
मन वर्तमानात किती जगत? त्याचा स्वभाव च नाही. म्हणून meditation करावं लागतं. म्हणजे वर्तमानात खऱ्या अर्थाने आपण जगू. जन्म कुठे घ्यायचा आणि शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही , मग मधल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तरी आपल्या हातात कश्या असतील ? माणसांचा अहं असतो. माणूस स्वतः ला कर्ता समजतो. कर्ता भाव त्यागून मन देवाला समर्पित करावं. मग कर्म योग सुरू होतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत एवढं च लक्षात ठेवायच
असतं.

जे आयुष्यात घडणार तेच घडणार किंवा घडत असतं.
जे आयुष्यात नाही घडायचं ते नाहीच घडणार.

मागे वळून पाहिलं की आयुष्यातली एक जरी घटना वजा केली तर आयुष्याला वेगळं वळण 
लागलं असतं की. 

प्रत्येकाचं आयुष्य कांदबरी सारखं असतं. काही तरी वेगळेपण , कादंबरीतल्या पात्रातल वेगळं अस्तित्व  , व्यक्तिमत्व प्रत्येकाच वेगळा ठसा उमटवत असतं  वाचकाच्या मनावर!

श्वास दिले म्हणून मातृदेवो भव म्हणावं. त्या नंतर देवाचे आभार मानावे  . आपण चांगली कर्म केली आता पर्यंत तर पुढे ही तो देव चांगलं कर्म करायला भाग पडणार च आहे की!

देवाने जन्म घेतला  मृत्यूलोकात तरी त्याच्या 
सुद्धा वाट्याला चांगले वाईट भोग येतात च की!

मन कधी शत्रू असतं तर कधी मित्र! फक्त आपण त्याला गुलाम करावं नकारात्मक विचारांना सकारात्मक करावं! 
Never be a servant of Mind ! Make mind ones servant ! Be conscious at every moment of life! Be here and now ! Live in present ! That's the task for human being! 

हर  हर महादेव ! जय श्रीराम ! जय श्रीकृष्ण !

( C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .