भारतात Mall संस्कृती इतकी काही टिकणार नाही . काही चालतात योग्य ठिकाणी असलेले . बाकीचे बंद होतात . कारण, एकच श्रीमंत लोक जास्त जातात , गाडी काढली आणि गेले mall मध्ये . देशाची जास्त लोकसंख्या सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणसाच दुकानदारा सोबत फक्त पैश्याचं नातं नसतं, भावनिक ही नातं असतं. ग्राहक आणि दुकानदार यांचं जुळलं एकदाच की मैत्रीचं नातं होतं. आमच्या घरी सगळेच दुकानदारा सोबत इतर गप्पा मारतात आणि चुकून कोणी नाही आलं दुकानात तर घरच्यांना विचारतात तुमचे वडील दिसले नाही गावी गेले का? Lockdown मध्ये दुकानात खाऊ च्या जाता आलं नाही तर भावाला दुकान वाले हाथ दाखवायचे . तो पण ह्या च काळात शिकला व्यावहारिक जगात वावरणं. Update केलं त्याच version देवाने . नाहीतर कधी गरज नाही पडली त्याला दुकानात पाठवायची. आता वाटेत कुठे ही दिसला तर दुकानदार स्वतःच बोलतात तुला इथे इथे पाहिलं होतं म्हणून . लक्ष असतो त्यांचा. दुकानातून काही घेतलं नाही तरी गप्पा मारायला यायचं की असं ही एक उत्तराखंड चे दुकानदार बोलले. एकदम down to earth माणसं ती.
कंपनी साठी रोज जेवणाचे डब्बे त्यांचे ठरलेले असतात. घरगुती हॉटेल सारख कमी किंमतीत नाष्टा , भाजी , डाळ , भात जेवण मिळत त्यांच्या कडे. नाहीतर बाकीच्या दुकानात आधी पैसे द्या आणि मग खा. ती काही आपली संस्कृती नाही.
(C)
#Vidyamslife
0 comments:
Post a Comment