सगळ्यात आनंदी क्षण कोणता?


आनंदी क्षण कोणता? आनंदी क्षण गवसलेली व्यक्ती खरं तर समाधानी असते!
समाधानी मनाला एखाद्या गोष्टीत आनंद मिळू शकतो! माझा सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे जेव्हा आयुष्यात पहिले गुरू भेटतात तो!आयुष्य जगताना खूप प्रश्न भेडसावत असतात?आपण करतो ते चूक का बरोबर?आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे का?
नंतर कळलं प्रवास महत्त्वाचा !ध्येय माहिती असणं जास्त महत्त्वाचं असतं ! मग पावलं चालत राहतात दिशा शोधतात ! वळण आलं तरी थांबायचं नसतं ! चालत राहायचं कोणी सोबत असो वा नसो !आपण आपलाच सोबती व्हावं! कधी सोबत सहवासाची लाभते कधी मनाची!मनाची सोबत म्हणजे एखादी व्यक्ती दूर असली तरी मनाने जवळ असते!तिचे विचार आपल्या सोबत असतात मग ती व्यक्ती देहाने दूर गेली तरी तिने दिलेला लढा कायमच लक्षात राहतो ! माझी पहिली गुरू तर आईच!
कोणत्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं अन्याय झाला की गप्प नाही राहायचं विरोध करायचा!हे तिच्या कडूनच कळलं!आयुष्य जगणं म्हणजे कला आहे कधी कुरुक्षेत्र इथे स्वतःच्याच मना सोबत युद्ध असतं नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी च!
आपण कसे कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो हे आपल्या दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतं!ज्यात आईचा वाटा मोठा मग वडिलांचा ! आपण या दोघांना अनुकरण करून शिकत असतो कसं वागायचं? कसं नाही?
नंतर शिक्षक ,समाज, गुरू असतोच आयुष्य जगावं सुचवायला! पण शेवटी वाट आपल्यालाच निवडायची असते आपापली!
प्रेरणा देणारी व्यक्ती किंवा एखादं व्यक्तिमत्त्व उदाहरण असतं स्वयंभू  ज्या मुळे आपल्याला प्रेरणा मिळते ! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर एक तरी व्यक्ती लागते प्रोत्साहन द्यायला ! मग प्रवास कसा सुखकर होतो! कारण कोणाचीच सोबत कोणाला आयुष्यभर पुरतं नसते! म्हणून प्रत्येक टप्प्यावर एक व्यक्ती ज्याला आपण गुरू मानू अशी भेटली की जगणं सुखकरच होतं! गुरू म्हणजे सावली रणरणत्या ह्या आयुष्यातल्या उन्हातली! म्हणजे आयुष्यभर गुरू ची सोबत कधीच सोडू नये ! त्यांचे विचार जगणं शिकवतात आणि आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करायला मदत ही करतात! धैर्याने आणि प्रयत्न चिकाटीने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते हे माणूस स्वतःच उदाहरण इतरांना देऊन प्रोत्साहन करूच शकतो !

विद्या
२५.४.२०२०

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .