post 131 मठा मध्ये दान करा

रामायणात मठ होते म्हणून सीता आणि तिच्या मुलांना आधार मिळाला. मठात संत समाज राहतो.  आपल्या इथे पुरी च्या शंकराचार्य यांनी सांगितलं आहे मंदिरांना दान करता त्या पैश्याचा काय उपयोग होतो समाजाला त्यापेक्षा मठ असतील त्यांना दान करा म्हणजे आम्ही मोफत आरोग्य सेवा ,शिक्षण व्यवस्था ही सुरू करू.

आपल्या इथे अनाथाश्रम असो किंवा वृद्धाश्रम मठ संस्कृती मागे पडली म्हणून अस्तित्वात आली म्हणायची! 

वानप्रस्थाश्रम नावाचीही गोष्ट असते अमुक अमुक वय झालं की वृद्धांनी स्वतःच्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुलांपासून वेगळं राहून जीवन आध्यात्मिक प्रगती साठी व्यतीत करणे.

तरी काही जण दक्षिण भारतीय काळी लुंगी घालून काही वेळा पुरुष मंडळी एकत्र मित्रांसोबत राहतात घरापासून वेगळं.

मंदिराचा पैसा आजही फक्त हिंदू साठी वापरला जात नाही .
मंदिर हिंदुकडे असते. मागे तर हिंदू च्या पैश्या चा वापर करून 
तिरुपती बालाजी मधल्या दानपेटी चा उपयोग हिंदू च धर्मातरण  करण्यासाठी झाला !

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .