कोकणात बारा महिने पाणी!पण दुष्काळ असतो तो माणुसकीचा!
कोकणातली माणसं साधी भोळी हे गाणं ऐकायला बरं वाटतं पण त्यात काही खरं नाही चुकून असतील काही अपवाद! आमच्या गावात देव देवस्की खूप करतात माझी आई कमी वयात देहाने दूर झाली आमच्या पासून ! नववी ...बारावी होती तेव्हा ही गावची लोकं शहरात राहतो म्हणून जळायची ! तेव्हा ही माझ्या मागे ह्यां गावच्या लोकांनी देवस्की केली !
माझ्या वडलांनी घर बांधलं एकत्र कुटूंब आहे ! मधून मधून लहानपणी आर्थिक मदतही केली सख्या भावाला!
आता त्यांनीच घरावरचं नाव काढून टाकलं ! वडील तक्रार करून आले ग्रामपंचायत मध्ये! वाटे सुद्धा जमिनीचे केले नाही ना आम्हाला काही पाच पैश्याचा फायदा होतो तरी आमचं वाईट चिंततात ती लोकं!
२०१९ मध्ये तर कहर च केला माझ्या वडिलांच्या सख्या भावाने आणि त्याच्या मुलाने देव देवस्की करून मला ICU मध्ये पाठवलं ! मागची नवरात्र हॉस्पिटलमध्ये काढली होती ! :( स्वामी समर्थ चा फोटो होता रोज नामस्मरण करायची आणि देवाचा आशिर्वाद म्हणायचा !
मारणाऱ्या पेक्षा तारणारा मोठा असतो असं उगाच बोलत नाही!
#विद्या

0 comments:
Post a Comment