निचरा व्हावा
आसुसलेलं मन कसला ना कसला ध्यास घेतं
मनासारखं घडलं नाही की दुःख मनी दाटतं..
अशावेळी मनसोक्त रडून घ्यावं
स्त्री असो पुरुष भेदभाव नसावा ..
भावनांचा निचरा करावा ...
मनाची चलबिचल मग थांबावी ..
शांत मना करून जावी...(विद्या)
कधी एकांतात तर कधी सोबती सवे ..
मन आपलं व्यक्त करावं ..
साठवून काही ठेवूच नये ..
आभाळ कोसळणारं दुःख दाटलं तरी ..
मनाचा तोल ढासळू नये ..
जीवन फार अनमोल आहे..
त्याची जाण ठेवावी...
देवाकडे भक्तीने श्रध्येने चार फुलं वाहावी ...
मनातलं सल मांडावं ...
मन हलकं करावं ..
खंबीर मनाला करून परिस्थिती समोर झुंजावं ...
चार हात करून मी लढणार आणि जीवनाला जिंकणार म्हणावं ..
~ विद्या
© #vidyamslife
विषय :
भावनांचा निचरा व्हावा
क्लेशाचा दर्प ही नसावा

0 comments:
Post a Comment