आठवणी येतात आणि जातात ...
आठवणी जाळतात हृदयाला आणि राख करून टाकतात ..
तरी माणूस जगणं सोडत नाही..
मृत्युच्या प्रतिक्षेत रात्र रात्र जागतो ...
वेदना असह्य होतात ...
दुरावा नकोसा होतो ...
शब्द अबोल होतात...
जखमा भळभळतात ...
प्रारब्ध स्वीकारणं शेवटी हातात उरतं..
मागे उरतात त्या आठवणी हव्याहव्याश्या ..
त्याच सोबती होतात ...
मग जगणं पुढे सरकत जातं...
दिवस जातात ..
काळ लोटतो ...
आठवणी तरीही ताज्याच राहतात ...
भावनेचा बांध कोसळतो ..
क्षणात चटका लावूनी जातो ..
विरह नात्याचा असह्य होतो ...
मृत्यू थेट देह गाठतो ...
© #vidyamslife
२२ जून २०२१

0 comments:
Post a Comment