कर्म

माणूस चांगला किंवा वाईट वागण्या मध्ये संगत सुद्धा कारणीभूत असते .. आता घरच्यानी चांगले संस्कार केले आणि वाईट मित्रांची संगती लागली तर ती व्यक्ती बिघडणार ना ...  काय चांगलं काय वाईट ह्याला विवेक बुद्धी लागते ...  सकारात्मक विचार करणारी माणसं परीस्थिती कशीही असली तरी  उंची गाठतात ..  तरी शेवटी स्वतः काय करायचं हे तीच व्यक्ती ठरवते ...  ज्याच्या मनावर  इतरांचा ताबा असतो सारासार विचार बुद्धी नसते ते वाईट मार्ग स्वीकारतात .. त्याची फळं त्याला च भोगावी लागतात .. कुटुंब चांगलं असो वा वाईट .. ज्याच्या त्याच्या कर्माचा तो धनी ..

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .