vidyamslife:
स्त्री पुरुषां मध्ये भिन्न नाती असतात जी त्या दोघांच्या भावनेवर आधारित असते तर कधी
वासनेवर. दोघां मध्ये ओळख होते मैत्री होते. स्वभाव जुळतात कधी जुळवले जातात. कधी एक जण दुसऱ्याच्या प्रेमात पडत तर कधी दोघे. एकतर्फी प्रेम निव्वळ आकर्षण असतं. शेवटी वासने मुळे आलेले दोन जीव नंतर दुरावतात.
मैत्री उरते संवाद संपले तरी. काही मध्ये लोभ असेल तर दुसऱ्या बद्दल अनादर करणं सुरू होत आणि नाती तुटतात. मग मैत्री असो किंवा काडीमोड घेतलेली नाती असो.
खरी नाती मनाने जवळ असतात देहाने दूर असली तरी नाती जपतात. मग मैत्री म्हणून किंवा प्रेम म्हणून. मग सहवास लाभो वा न लाभो नाती जपली जातात निःशब्दा ची सोबत झाली तरी.
एकत्र येऊ शकत नाहीत ती निरोप घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्याला मार्गावर निघून जातात.
प्रत्येक जण सोबतीच्या शोधात असतो कधी भेटतो कधी नाही. देहाने वासनेने झालेली नाती काही मनाने जवळ नसतात नुसती सोबत असतात आणि मग सवय होते .
जोडीदार एकमेकांच्या भावना जाणून एकमेकांना साथ देणारा हवा.
नातं कमजोर असेल तर तिसरी व्यक्ती येते आज काल चौथी ही येते आणि दोघांना कल्पना ही नसते.
फक्त समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहणारी ही जोडपी असतात.
ज्यांना जमत नाही ज्यांची मन जुळत नाही वाद होतात मुलं असो किंवा नसो काडीमोड घेऊन
स्वतंत्र होऊन आयुष्य सुखाने जगतात .
एकमेकांना त्रास देऊन कसलं सुख मिळणार असतं तसही. एकतर मनाने सोबत रहावं किंवा राहू नये. ओळख झाली की सगळं कळतं हळूहळू कोणाशी जुळत कोणाशी नाही ते. वेळ मात्र प्रत्येक नात्याला द्यावा लागतो.
एकमेकांचा स्वभाव जुळणे नैसर्गिक गोष्ट असते कोणी कोणाला उगाच साथ देत नसतं.
अनैसर्गिक रित्या एकत्र राहणारी जोडपी एकमेकांना फसवतात .शिवाय समाजात मान मिळावा म्हणून कित्येक गोष्टी माणसं करतच असतात मग घरात नात्यात सुख लाभो किंवा न लाभो. काही मुलांसाठी सोबत राहतात.
काही बायको आजारी पडली की दुसरीच्या प्रेमात पडतात.
काही arrange marriage करणारे पूर्व प्रेयसी ला च आठवत बसतात आणि बायकोला फक्त देह मानतात. Body shaming ही करतात.
सार इतकंच की नाती दोन तर्फी हवीत मग मैत्री असो किंवा प्रेम.
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment