मराठी साहित्य संमेलन

मराठी संमेलन फक्त नावाला मराठी संमेलन असतात ह्यात जास्त करून राजकारण च खूप असतं . अमुक विचारांचा प्रसार करण्यासाठी आयत मिळालेलं व्यासपीठ. 

मराठी भाषेसाठी काय काय उपक्रम राबवता येतील  .. भाषेसाठी काय काय कार्य गेलं हे दरवर्षी द्यावा की आढावा .. लाखो करोडो रुपया ची उलाढाल करतात मात्र ही साहित्यिक मंडळी..

काम किती करतात मराठी भाषे साठी...

त्या गुजरात मध्ये संमेलन होत नाहीत तरी भाषा टिकून आहे त्यांची...
आणि आपल्या इथे मराठी भाषिक हिंदी इंग्रजी सुद्धा बोलतात दोघेही मराठी असले तरी.

मराठी मध्ये कोणत्या साहित्यिकाच्या पुस्तकांचा जास्त खप झाला आणि त्या साहित्यिकांना पारितोषिक वगैरे काही दिल जात की नाही ह्या संमेलनाच्या निमित्ताने ...

मराठी लेखक कवी त्याच्या मुळे भाषा टिकून असते ह्या साहित्य संमेलनामुळे कमीच ...

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .