देशभक्ती

देशभक्ती च्या दिवशी काही लोकं आवर्जुन न चुकता लिहितात दोन दिवस तुमचं देशप्रेम उफाळून येतं म्हणे । ह्याचा अर्थ काय
वर्षाचे 12 महीने देशवासियांना काहीच वाटतं नाही असं थोडी असतं । मैत्री दिवस , भाऊबीज , आई ,वडिलां साठी असे खूप सारे दिवस साजरे करतो म्हणजे त्यांच्या वर एक दिवसा पुरतं प्रेम आहे असा अर्थ काढायचा का मग  यांच्या विचाराने  ?  प्रत्येक दिवसांच वेगळं महत्त्व असतं  . व्यक्त करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी वेगळे  दिवस असतात  हेच विसरून कसं चालेल ।  दुसरे काय करतात ह्यापेक्षा आपण देशासाठी काही अंशी तरी काही करू शकतो का हा विचार करणं महत्त्वाच नाही का वाटतं  #Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .