माणसाने वय झालं की आपली सत्ता पुढच्या पिढी कडे द्यावी !
मग किचन असो किंवा आयुष्यातले निर्णय असो जबाबदारी असो शारीरिक, मानसिक काळजी घ्यावी ! कोकणात बोलतात तस देवक काळजी बोलावं ! अति चिंता घातक च !
आयुष्य स्वतः च आणि कुटूंबातल्या व्यक्ती च स्वीकारावं त्या व्यक्तीला मोकळं वातावरण द्यावं निर्णय स्वतः चे घेण्याचं स्वतंत्र द्यावं !
शिक्षण झालं की पालकांनी आपली जबाबदारी च ओझं खाली टाकावं ! नाहीतर चिडचिड आजारपण वाद घरात होणे अटळ असतं !
अध्यात्मिक गोष्टी शिकाव्यात ! मग मन शांत होत जगा आणि जगू दया हा मंत्र अवलंबणे उत्तम !
अस्वस्थता कमी होते ! शांतता असली की घरात सुख नांदते !
#vidya

0 comments:
Post a Comment