स्वतः च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारे मात्र दुसऱ्याला फुकट चे सल्ले द्यायला पुढे असतात ! मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात यांना जास्त रस असतो! समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही माहीती नसतं ! मनस्थिती ची जाणीव नसते !
संपर्कात राहणं ही जमत नसतं अश्या लोकांना !
आजूबाजूची परिस्थिती बदलते त्या नुसार माणूस रोज नव्याने घडत जातो. खरं तर नवीन नवीन माणसांच्या संपर्कात आल्यावर व्यक्तिमत्व विकास ही होतो . कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही शिकवत आपल्या वागणुकीतून .
माणसांनी दुसऱ्याला आहे तसं स्वीकारता आलं नाही तर मार्ग बदलावेत . समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर वाद घालण्या पेक्षा दूर राहणं उत्तम ! नुसती जुनी ओळख आहे म्हणून कोणाला फुकट सल्ले , मत देण्याचा , दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती नुसारच घेत असतो . स्वतः ला आधी स्वीकारलं तर जगाने स्वीकारायची गरज नसते! स्वतःला ओळखावं आणि आपली वाट चालत रहावी अविरतपणे . कोणी सोबती भेटतील कोणी वाटा बदलतील वळण आली की!
आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हावं! ध्येय निवडावे आणि गाठण्यासाठी सदैव तत्पर रहावं!
स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं . चुकत चुकतच माणूस नव्या गोष्टी शिकत असतो. आई , वडील आणि आपलं कुटुंब यांच्या सोबतच आपण बांधील असतो . बाकी समाज फक्त नावाला असतो . वेळ आली की आपलीच माणसं सोबती असतात . सगळं काही त्या त्या वेळेवर गोष्टी झाल्या की समाज सोबत येतोच .
आपण आपलं नाणं खणखणीत वाजवावे.
© Vidyamslife

0 comments:
Post a Comment