विवाह

धर्माच्या नावावर सगळं चालतं ... धर्माने परवानगी license दिल्यासारखं ! अनोळखी मुलगा बरा चालतो विवाहा साठी .. ओळखीच्या मुलाशी मैत्री केली तरी खटकणारा समाज आहे ..प्रेम विवाहा ला संमती देणं दूरच !नातं विश्वासाच असावं .. बंधनाची नाती थोपवलेलीच जास्त बघायला मिळतातमागे मी सांगितलं तर चिडल्या बायका ... स्त्री चा career घडत असेल तर पुरुषांनी घर सांभाळावं कि ..पण आपल्या इथे स्त्रियांना हि जास्त कमाई करणारा नवरा हवा असतो आणि पुरुषांना जास्त शिकलेली मुलगी खटकते .. लग्ना आधी मुलीनी job करायची अट आणि लग्न झाल्यावर मुलं झाली कि घर सांभाळ बोलायला मोकळे ...अमेरिका आणि भारताचा विवाह पद्धती वर विचार केला तर लोकसंख्या भारताचीच जास्त आहे ..आणि विवाह बाह्य संबध हि .. पुरुष आणि स्त्री दोघ अपवाद नाहीत ..म्हणून स्त्री वैश्या सगळी कडे भेटतील .. पुरुषांची अशी category च नाही मुळी ... नाही पटतं तर मुक्त व्हावं नात्यातून ... पण मुलां साठी हे हि टाळतात आपल्या इथे ..धर्माच्या नावावर सगळं चालतं ... धर्माने परवानगी दिली की मग झालं वैवाहिक जीवन सुरु करायला ! आपल्या कडे अनोळखी मुलगा चालतो विवाहासाठी .. ह्याच विवाह सोबत काही गोष्टी आल्या त्यातली एक हुंडा पद्धती ..सासु चा छळ वारस पाहिजे म्हणून ... शिवाय कोणी तलाक घेतलं तर छळणारा समाज ... मुलं नाही झालं तर बाई ला दोष देणारा समाज ...ओळखीच्या मुलाशी मैत्री केली तरी खटकणारा समाज आपला ..प्रेम विवाहा ला संमती देणं दूरच !  विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .