ओळख

नाती मना मनाची



      ओळख व्हायला मन जुळावी लागतात .  कधी एक क्षण हि पुरेसा असतो . नाहीतर कधी आयुष्यभर नाती जुळता जुळत नाही सोबत असूनही. कधी कधी आवडी, निवडी, विचार, स्वभाव इतके जुळतात कि पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री होते. तिथे जुळवून घेण्याचा अट्टहास नसतो. समोरच्याला काय वाटेल. आपण कसे वागावे काय बोलावे. असा विचार देखील नसतो.मोकळीक असते आपण आहोत तसं स्वीकारल्याची जाणीव एकमेकांना किती सुखावह असते मग !  
       सहवास लाभो न लाभो एकदा जुळलेली मन ...एकदा जुळलेलं नातं मनात इतकं घट्ट बांधलं जात कि कितीही दुरावा आला . तरी भावनांचा धागा नेहमी जोडून ठेवतो नाती मना मनाची. पुन्हा भेट होता मग दोघे मनोमन सुखावतात. क्षणभर भेटीत देखील तृप्त होतात. जिथे शब्द निशब्द होतात. भावना अंतरीच्या हळव्या होतात . आठवणी कोवळ्या मनी दाटतात ... अंतरीच सुख लपवण कठीणच होऊन बसतं .. अश्यावेळी ... दुराव्याची कारणं किती हि असो .. सारं काही विसरून एकमेकां मध्ये नाती पुन्हा गुंफतात .. नव्याने गप्पा रंगतात .. दुराव्याचे नियम हि पाळतात .. तरी मनाची जवळीक ... अंतरीची भावना अगदी तशीच ... क्षणभर हि न बदलेली ... मनाच्या कुपीत जपून ठेवलेली ... अगदी काळ गेला किती मागे हि पुर्नभेट होता ह्याचा मनात मागमूसही नसलेली ... असतो फक्त नात्याचा ओलावा मनीचा सोबती. क्षणिक लाभलेला सहवास . मनाचा कोपरा हळवा करून जाणारा .
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .