post 2

आज काल काही शहरातल्या स्त्रिया शाळा , कॉलेजमध्ये जाणाऱ्या असो किंवा social media वर स्त्री वादी म्हणून स्वयं घोषित म्हणून वावरणाऱ्या मध्ये काही गोष्टी समान आहेत  शिव्या देणे , दारू पिणे , मुलांसोबत सिगरेट ओढणे . पाश्चिमात्य संस्कृती का विकृती कोळून पिल्या असतील म्हणायचं! पुरुष बनण्याचा अट्टहास असतो केवळ ! काही पुरुषां सारखे कपडे घालणे आणि पुरुषां सारखं वावरणं सुरू असत! 
मानसिकता च विचित्र आहे ही !

स्त्रियांना शारीरिक आरोग्य बिघडलं की doctor स्वतःहून सांगतात घट्ट jeans नावाचा प्रकार घालू नका. घर की मुर्गी दाल बराबर.

भारतीय वेशभूषा सैल आणि कमी शिवण असलेले कपडे घालण्याची आहे आणि भारतीय संस्कृती युगा पासून सुरू आहे ; राज्य बदलू तसे कपडे आणि भाषा बदलत असते ! 

कोणत्याही गोष्टी ची अति करू नये इतकंच मत आहे. 

काही स्त्रिया मुलांना फक्त जन्म देतात आणि स्त्री वादी विद्या बाळ सारख्या नेत्यांना मानतात आणि स्वतःच्याच मुलांची , नातेवाईकांची काळजी घेत नाही ! समाजात फक्त नाव  व्हावं म्हणून सामाजिक कार्यकर्ते बनतात! अति शिकलेल्याही असतात ; मग घर च्या वर जबाबदारी टाकून मोकाट स्वतंत्र फिरत असतात समाजात! त्यातल्या काहींना माणूसकी चा गंध ही नसतो! जवळच्या मैत्रिणी ओळखून पार असतात अश्या दिखाऊ सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचे रंग  त्यात काही वारस हक्काने सेलेब्रिटी ही असतात (social media वर फक्त)  खऱ्या आयुष्यात आजूबाजूचा समाज फक्त ओळखतो इतर ठिकाणी ओळख करून द्यावी लागते !

काही स्त्रिया मूल परदेशात असूनही पैसे नसल्या सारख्या महागाई या विषयावर शेजारी सोबत गप्पा मारताना दिसतात !

©

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .