स्पर्धा

दोन प्रकारचे माणसे असतात स्वतः सोबत  स्पर्धा करणारे दुसऱ्यां सोबत स्पर्धा करणारे

स्वतःशी स्पर्धा करणारे दुसऱ्या सोबत तुलना करण्यात वेळ घालवत नाहीत. स्वतः च्या चुका शोधतात, त्यातून शिकतात, धडपडतात आणि आपलं निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतात.  ह्या उलट इतरां सोबत स्पर्धा करणारे इतरांसोबत तुलना करण्यात वेळ घालवतात. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी धडपडत असतात.  स्वतः पेक्षा दुसऱ्याच्या चुका कडे लक्ष देतात. दुसऱ्यांना काय वाटेल याचा जास्त विचार करतात. स्वतः सोबत स्पर्धा करणारे स्वतः चे निर्णय स्वतः घेतात. स्वतः ला योग्य वाटेल तेच करतात. समाज काय बोलेल यापेक्षा आपण कुठे आहोत ? आपला विकास कसा होतोय आपण सकारात्मक विचार करतोय का ?  आपण निवडलेली गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो का? आपल्या आयुष्यात काय करायचं आहे आणि ती गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर स्व च्या शोध घेतात  त्यासाठी धैर्य ही असतं. स्वप्न पाहतात कोणाला आपली स्वप्न सांगायची नसतात. इतरांना आपल्या स्वप्नाशी काही देणं घेणं नसतं. आपण कुठे आहोत काय करतोय ह्या कडे समाजाचं जास्त लक्ष असतं. आपल्याला काय करायचं आहे आपण काय करतो आहोत हे आपल्याला माहिती असण हेच पुरेस असतं.
स्वतः सोबत स्पर्धा केली तर आपला विकास अधिक होतो. दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी विकास करण्यात आपल्याला समाधान कधीच मिळतं नसतं. इथे प्रत्येकाच्या आयुष्य वेगळी गोष्ट असते. प्रत्येक जण घडत असतो तो त्याच्या आजूबाजूला घटना , परिस्थिती , भेटणारी माणसं  यावरुन. वाचन करून माणूस अधिक समृद्ध होतो कारण तो नम्र असतो त्याला दुसऱ्या व्यक्तीचे अनुभव जाणून घ्यायचे असतात.ती आयुष्य कसं जगते, आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना  कसं तोंड देते हे कळतं.
माणूस अनुकरण आणि इतरां कडून प्रोत्साहन घेऊन शिकतो.स्वतः साठी स्पर्धा करणारे स्वतः साठी आयुष्य जगतात. दुसऱ्या सोबत स्पर्धा करणारे आयुष्य घालवतात.
© vidyamslife 2021
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .