माणूस

माणूस सामाजिक प्राणी आहे त्याला व्यक्त व्हायला नातं हवंच असतं .. संवाद करण्यासाठी कधी समजुन घेणारं .. काहींना घरीच भेटतात तर काही मैत्री साठी नवी नाती जोडतात..तरीही स्वतःला पूर्णतः कोणी समजून घेईल आपले प्रश्न समोरची व्यक्ती सोडवेल म्हणून दुसऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा करू नयेच मुळी..त्याच्या वर मानसिक दृष्टीने अवलंबून राहू नये ..आयुष्यात कधीही कोणी येतं आणि प्रारब्धात असतं तेच घडतं काही नाती आयुष्यभर साथ देणारी असतात काही वळण आली की आपापल्या मार्गाने जाणारी ही भेटतात..मोह टाळता आला वपु च्या भाषेत एकटेपणा  एकांत वेगळे असतात ..एकांताचा कोणी अंत करू नये ..एकटेपणा पेक्षा एकांतात आयुष्य जगावं कोणी सोबत असो वा नसो त्रास होणार नाही .. #vidya
27 sept 18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .