आयुष्य आणि समाज

#success #life #society
पहिला लेख 
==========
#आयुष्य  आणि  समाज #मनस्वीविद्या
===========
आयुष्य  आणि  समाज  एकाच नाण्याच्या दोन बाजू बालपणाच्या काळात फक्त समाज नावाची गोष्ट ठाऊक नसते आणि  त्याच काळात  माणूस  खरया अर्थाने  जीवन  जगत  असतो  ..मनमोकळे पणा  निरागसता  जीवनाची खरी व्याख्या बालपणीच्या क्षणात सापडते .पुढे वय  वाढत जातं  तश्या  जबाबदाऱ्याही …
सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या  गोष्टी वेळेवर झाल्या  कि तुम्ही  समाजात  जगायला  मोकळे …
संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ  शकतं  का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..
समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी  केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं  हा समाज … कधी ऐकलं  नाही  व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का  … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या  विचारांची  सवय झाली  असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..
मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे  ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला  ह्याच गोष्टी  कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने …  आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं …
तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं …
ह्यालाच म्हणतात का … success ?
काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा  तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी …
खऱ्या  अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं …
4/4/16
#vidyap

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .