पालकत्व आणि बालपण

घरात पैश्या पेक्षा शांतता हवी असते! सतत वाद होत असतील तर मुलांवर मानसिक परिणाम होऊन मोठे झाल्यावर मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागतो! मुलांच्या विकासासाठी फक्त शारीरिक , आर्थिक सोबत मानसिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सुध्दा आई , वडलांची असते! नातं टिकत नसेल तर पालकांनी स्व खुशीने वेगळं होऊन एकाने मुलाची जबाबदारी स्वीकारून मुलांचं संगोपन करणं महत्त्वाचे !  नाही तर मुलं किती ही हुशार असली तरी  जोडीदार हवा किंवा नको ह्याच दुविधे मध्ये ग्रासित होऊन संन्यासी ही  व्हायचा विचार करतात! काही जण आपल्या मुलांना एक देश सोडून दुसऱ्या देशात घेऊन जातात तिथे शाळेतल्या मुलांनी बरोबर वागणूक दिली नाही तर मुलांच्या मानसिक ते वर परिणाम होऊन समाज वाईट असा समज करून घेतात! जसं जसं वय  वाढत जात तसं भूतकाळ च्या गोष्टी आणि चुकीच्या कल्पना आणि पालकां  पासून लपवलेलं दुःख सगळं पुन्हा स्मरणात येतं !स्वतः चा शोध घेता घेता अशी मुलं चित्रकार होतात ! नवीन देशात शिकायला जातात किंवा नोकरी करतात !  समाजातल्या इतरांना ही मदत करतात!

© Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .