जेव्हा train नव्हती तेव्हा कोकणात ST ने प्रवास करायचे.
मोबाईल नव्हते तेव्हा std call किंवा तार ने संपर्क साधला जायचा.
आणि आता काही गाव समृद्ध झाली खऱ्या अर्थाने आणि काही अजूनही मागासलेल्या विचारांची आहेत . आजही कोकणात जमिनीवरून भावकीत वाद होतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी साठी वाद होतात.कोकणात देव देवस्की विरोधात आता कायदा ही आला आहे. कारण एकच इथली लोक जीव घेईपर्यंत देव देवस्की करतात कधी भावकीत कधी घरची कधी शहरात येऊन कोणाशी शत्रुत्व असेल तर. कोकणाची काळी बाजू दाखवली नाही तर ह्या गोष्टी कमी कश्या होणार. लहान मुलं चुकली तर पालक ओरडतात आणि कोकणातली वाईट माणसांबद्दल नाही लिहिल तर हे सुद्धाअसच चालू राहील. झाकून ठेवलं म्हणून सत्य काही लपत नसत. काही चाकरमानी ह्याच वाईट लोकांमुळे गावी जाणं टाळतात. आता गावी जायला train ,विमान सगळ्या सुविधा उपलब्ध असताना काहींना गावी जाण्यापासून वंचित रहावं लागत याला कारण देव देवास्की इतकं आहे.
© #निसर्गरम्यकोकण
कोकणातली काळी बाजू दाखवायचा प्रयत्न करू. कोकणात बदल होईल असं अपेक्षित आहे .

0 comments:
Post a Comment