नाती

आयुष्यात नाती भेटतात. दोन अनोळखी व्यक्ती एका वळणावर भेटतात काही आवडी निवडी मुळे तर कधी समाजात वावरताना. कोण कोणाच्या आयुष्यात किती दिवस राहणार हे मात्र कधी नियती ठरवते तर कधी त्या दोन व्यक्तींचा स्वभाव ; तर कधी परिस्थिती!प्रत्येक नात्याचं अस्तित्व असतं ज्यात जीवन असतं!कोणी आयुष्यात येतात आणि कायमचे मैत्र जुळते मन जुळतात एकमेकांना आहे तसं स्वीकारलं जातं तेव्हाच कुठे नाती पूर्ण होतात! कोणीच परिपूर्ण म्हणून जन्माला येत नसतं!पण स्वभाव जुळले, आवडी ,निवडी, एकमेकां बद्दलचा आदर , जिव्हाळा, आपुलकी आणि मनमोकळं पणाने व्यक्त होण्यासाठी ची हक्काची जागा मिळाली की नाती जपली जातात! नात्याचं पण आयुष्य असतं कोणी आपल्याला आठवणी देतात तर कोणी आपल्याला धडे गिरवायला लावतात! कोणी त्यांच्या वागणुकीतून आपल्याला प्रौढ करतात! बालपणीचा निरागसपणा कधी जपला जातो कधी वय वाढत जातं तस माणूस समजूतदार होतो विवेक बुद्धी जागरूक झाली की कसे वागावे पेक्षा कसं वागू नये हे शिकतो! आयुष्याच्या प्रवासात माणसाचं येणं जाणं सुरूच असतं पण मनाने दूर  गेलेली नाती पुन्हा जुळता जुळत नसतात! कोणाचं वागणं तर कधी कोणी एकमेकांना समजून घेतलं नसलं की वियोग अटळ ! नात्यांचा गुंता झाला की सोडून देणं उत्तम असतं ते ही दोघांसाठी ! 
मग एक नात्याचा प्रवास संपतो मग नाती मात्र काहीतरी शिकवून जातात तर कधी कसं वागावं कसं वागू नये हे ही शिकवतात! स्वभाव आणि आवडी निवडी, आदर भावना ह्यामुळे फक्त नाती टिकतात!


© Vidyamslife
29 oct 2024

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .