मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.
आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment