धर्म

कृष्णा च्या सहवास दुर्योधना ला ही लाभला होता तरी त्याचा अधर्माशीच संबंध होता की! माणूस    धार्मिक स्थळा पाशी असला म्हणून काही तो धार्मिक असतं नाही ! मनात असावी लागते श्रद्धा!  पशुपतिनाथ मंदिरात सुद्धा संन्यासी  स्वतःला संत समजणारे लुटतात मग ती व्यक्ती हिंदू असो किंवा परदेशी  !

....


 धार्मिक स्थळाची जबाबदारी फक्त तिथल्या लोकांची नसते भक्तांची ही असते की! चुकीचं घडत असेल तर बदलायलाच हवं! 
...
या मंदिरातल्या प्रथा समाजानेच केलेल्या  असतात आणि समाजानेच वेळे नुसार बदलायच्या ही असतात! आपल्या इथे तर सती प्रथा होती आणि  केशवपन ही होतं बंद झालं! मागे ऐकलेलं पंढरपूर मध्ये सुद्धा एकजण देवाच्या पाया पडण्या आधी पैसे घ्यायचा नंतर तिथल्याच जागरूक लोकांनी बंद केला त्याचा देवाच्या नावावर पैसे घेण्याचा धंदा!

.....


आस्तिकां साठी देव तर आहेच आणि धर्म ही आहे! देव आणि धर्माचं अस्तित्व मानायचं की नाही यासाठी स्वतंत्र आहे प्रत्येकजण!

....

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .